Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Election 2025 : भाजपचा विजयीरथ छोट्या पक्षांसाठी ठरतोय कर्दनकाळ; ८ पक्षांचं काम तमाम, आता या दोन पक्षांवर असणार नजर…

दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली तर ओडिशा, महाराष्ट्र, काश्मीर आणि हरियाणा नंतर हे पाचवं राज्य ठरणार आहे. त्यामुळे एका वर्षात भाजप पाच राज्य काबीज करणारा पक्ष ठरणार आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 07, 2025 | 09:14 PM
भाजपचा विजयीरथ छोट्या पक्षांसाठी ठरतोय कर्दनकाळ; ८ पक्षांचं काम तमाम, आला लक्ष्य या दोन पक्षांवर...

भाजपचा विजयीरथ छोट्या पक्षांसाठी ठरतोय कर्दनकाळ; ८ पक्षांचं काम तमाम, आला लक्ष्य या दोन पक्षांवर...

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीची निवडणूक भाजपने जिंकली तर ओडिशा, महाराष्ट्र, आणि हरियाणा नंतर हे चौथं राज्य ठरणार आहे. त्यामुळे एका वर्षात भाजप पाच राज्य काबीज करणारा पक्ष ठरणार आहे. जर भाजपने दिल्ली जिंकली तर आम आदमी पक्षाचं मोठं नुकसान होईल. एवढंच नाही तर दिल्ली निवडणुकीच्या निकालांचा परिणाम नितीश कुमार यांचा जेडीयू सत्तेत असलेल्या बिहारवरही होणार आहे.

२०१४ नंतर भाजपचा अश्वमेध रोखण्याची ताकद कोणत्याही पक्षात राहिली नाही. काँग्रेसला थेट पराभव पत्करावा लागला, परंतु महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, ओडिशा सारख्या राज्यांमध्ये अजूनही प्रादेशिक पक्षांचा प्रभाव आहे. २०२४ मध्ये इंडिया आघाडीच्या मदतीने काँग्रेसने जोरदार पुनरागमन केलं. यानंतर, लहान पक्षांनीही पाय पसरायला सुरुवात केली, परंतु गेल्या ४ निवडणुकांच्या निकालांमुळे लहान पक्षांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं आहे. एकेकाळी भाजपचे मित्र पक्ष असलेले ६ प्रादेशिक पक्ष पक्ष भाजपसमोर राजकीयदृष्ट्या कमकुवत झाले आहेत.

ओडिशात बीजेडी अडचणीत

नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाने ओडिशावर २० वर्षे राज्य केले. २०१४ मध्ये भाजपच्या प्रचंड लाटेतही बीजेडीची राजकीय भवितव्य अबाधित राहिली, मात्र २०२४ मध्ये बीजेडीला पराभवाचा सामना करावा लागला. निवडणुकीत पराभव झाल्यापासून बीजेडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. आतापर्यंत बीजेडीचे दोन राज्यसभा खासदारांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीही शिगेला पोहोचली आहे, जी हाताळण्यासाठी ७७ वर्षीय नवीन बाबू संघर्ष करत आहेत.

जेजेपी आणि आयएनएलडीचे वर्चस्व धोक्यात

१९९० च्या दशकात चौधरी देवीलाल यांचा आयएनएलडी हरियाणामध्ये सत्तेत होता. २०१४-१९ पर्यंत हरियाणा विधानसभेत आयएनएलडी विरोधी पक्षात राहिला. २०१९ पूर्वी, आयएनएलडीमध्ये फूट पडली आणि जेजेपीची स्थापना झाली. २०१९ च्या निवडणुकीत जेजेपीने किंगमेकरची भूमिका बजावली. जेजेपी प्रमुख दुष्यंत चौटाला यांनी भाजपसोबत तडजोड करून सरकार स्थापन केले. तथापि, २०२४ च्या निवडणुकीत, आयएनएलडीने हरियाणामध्ये २ जागा जिंकण्यात यश मिळवले, परंतु जेजेपीचा पराभव झाला. आयएनएलडी नेते अभय चौटाला यांचाही निवडणुकीत पराभव झाला.

काश्मीरमध्ये पीडीपीवर संकट

२०१४ मध्ये भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या पीडीपीचाही काश्मीरमध्ये पराभव झाला आहे. २०२४ च्या निवडणुकीत पीडीपीला फक्त ३ जागा जिंकता आल्या. २०१४ मध्ये पीडीपी हा नंबर वन पक्ष होता, पण २०१८ मध्ये दोन्ही पक्ष वेगळे झाले. पीडीपीच्या वरिष्ठ नेत्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना राजकीय मार्ग सापडत नसून त्याच्यासाठी हा मार्ग यापुढे सोपा असणार नाही. दुसरीकडे, खोऱ्यात भाजपचे वर्चस्व वाढले आहे. २०१४ मध्ये २५ जागा जिंकणारा भाजप २०२४ मध्ये २८ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातही क्षत्रपांचा खेळ

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू यांच्या पक्षांचं राजकीय वर्चस्व होते. उद्धव आणि पवार मुख्यमंत्री राहिले आहेत. भीमराव आंबेडकर यांचे नातू प्रकाश यांचेही दलित राजकारणात एक मजबूत पकड आहे. तथापि, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्व पक्षांचा पराभव झाला. उद्धव ठाकरे यांचे सध्या २० आमदार आहेत. त्याचप्रमाणे शरद पवार यांचेही फक्त १० आमदार आहेत. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मूळ पक्षही गमावले आहेत. २०२४ मध्ये प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडूही कोणताही चमत्कार करू शकले नाहीत. दोन्ही पक्ष त्यांच्या अस्तित्वासाठी लढत आहेत.

आता मिशन बिहार

या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. येथे नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू शिखरावर आहे. भाजप आणि जेडीयूमध्ये युती आहे, पण भाजपच्या विजयीरथासमोर ज्या प्रकारे लहान पक्ष अपयशी ठरले आहेत, त्यामुळे नितीश यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

गेल्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूला ४३ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपलाही ७४ च्या पुढे जाता आले नाही. अखेर भाजपने नितीश यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले. यावेळी काय होणार याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आले आहे. बिहार भाजप नेते नितीश यांच्याशी लढण्याबद्दल उघडपणे बोलत आहेत. तथापि, केंद्रीय हायकमांडने नितीश यांच्या नेतृत्वाखाली लढण्याबाबत अद्याप कोणतीही भूमिका मांडलेली नाही. महाराष्ट्रात कमी जागा मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले.

Web Title: Bjp becoming dangerous to regional parties since 2014 if bjp win delhi election 2025 its 4th state after odisha maharashtra and haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 07, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • Delhi Assembly election 2025
  • Delhi Election
  • Delhi Election 2025
  • indian politics

संबंधित बातम्या

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
1

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ
2

Who is Next PM: मोदी सरकार कोसळणार? 2029 आधी राहुल गांधी…; ‘या’ नेत्याच्या दाव्याने खळबळ

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा
3

महिलांच्या बँक खात्यात आता थेट 10000 रुपये येणार; पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा

Indian Gen Z : भारताच्या राजकारणातही आले Gen-Z ? भाजप नेत्यांनी राहुल गांधींना केले सावधान  
4

Indian Gen Z : भारताच्या राजकारणातही आले Gen-Z ? भाजप नेत्यांनी राहुल गांधींना केले सावधान  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.