Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगताप यांची जीभ घसरली! “आयोग मोदींच्या घराबाहेरचं श्वान…”

विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर राज्याचे राजकारण रंगले आहे. कॉंग्रेस आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2024 | 12:18 PM
Bhai Jagtap's tongue slipped while criticizing the Election Commission

Bhai Jagtap's tongue slipped while criticizing the Election Commission

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी संपली आहे. मात्र राज्याचे राजकारण रंगले आहे. निवडणुकीचा पूर्ण निकाल हा महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागला आहे. बहुमतापेक्षा अधिक मताधिक्य हे महायुतीला मिळाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कॉंग्रेस पक्षाकडून ईव्हीएम मशीनवर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले जात आहेत. आता कॉंग्रेस नेते व आमदार भाई जगताप यांनी जहरी टीका केली आहे. मात्र ही टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.

मतदानाच्या दिवशी सायंकाळी अचानक मतदानाचे प्रमाण वाढले. ईव्हीएममध्ये घोटाळा करुन शेवटच्या तासात ७६ लाख मतदान वाढल्यामुळे मविआचा पराभव झाला, असा आरोप नाना पटोले यांच्याकडून केला जात आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराबाहेर बसलेला श्वान आहे”, अशी टीका भाई जगताप यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माध्यमांशी संवाद साधून भाई जगताप म्हणाले की, “मी मागील 45 वर्षांपासून राजकारणात आहे. महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल लागला तो अनपेक्षित आहे. महायुती सरकारने एवढे मोठे काही काम केले नव्हते. चार महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. मी आधीपासून सांगत आलो आहे की, हा सर्व ईव्हीएमचा खेळ आहे. आज नाही तर उद्या यावर चर्चा व्हायलाच हवी. म्हणूनच काँग्रेसने पुन्हा मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. जर या लोकशाहीवर जर संशय घेतला जात असेल तर त्याचे उत्तर निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला द्यावेच लागेल.” असा घणाघात भाई जगताप यांनी केला.

पुढे भाई जगताप यांची टीका करताना जीभ घसरली. ते म्हणाले की, “निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या घराबाहेर बसलेले श्वान आहे. केंद्रीय यंत्रणा लोकशाहीला बळकट करण्यासाठी तयार करण्यात आल्या होत्या. मात्र दुर्दैवाने त्याचा दुरुपयोग सुरू आहे. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात कांड होत आहेत,” अशा खालच्या शब्दांमध्ये भाई जगताप यांनी टीका केली आहे.

राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर

त्यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा झाली. भाई जगताप यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्यावर जहरी टीका करण्यात येत आहे. मात्र भाई जगताप हे त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. भाई जगताप म्हणाले की, “निवडणूक आयोग आभाळातून आलेला नाही. लोकशाहीला बळकट करण्यासाठी आयोगाची स्थापना झाली असून कुणाची हुजरेगिरी करण्यासाठी आयोगाची स्थापना झालेली नाही. आयोग हुजरेगिरी करत असल्यामुळेच मी त्यांच्यावर टीका केली. मी माझ्या विधानावर ठाम आहे. टीएन शेषण यांनी ज्याप्रकारे काम केले, तसेच काम करण्याची आता गरज आहे,” असे मत भाई जगताप यांनी व्यक्त केले.

Web Title: Congress mla bhai jagtap enomous comment on election commission for maharashtra election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • cm of maharashtra
  • Congress

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.