मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने शुक्रवारी (15 नोव्हेंबर) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. मुंबई वांद्रे येथील MIG क्लब येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जाहिरनाम्यातून मनसे आपली भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. हे जनतेचे प्रश्न असल्याने ते सोडवण्यासाठी आम्ही काम करु, असे राज ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेमका या जाहीरनाम्यातून महाराष्ट्राला आणि मतदाराला काय आश्वासन-दावे आहेत, ते जाणून घेऊया…
यावेळी जाहीरनामा प्रसिद्ध करताना राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला मनसेची सभा होणार की नाही यावर भाष्य केलं. सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरच्या संध्याकाळी होणारी बैठक महत्त्वाची होती. आता वांद्रे एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतरच सभा घेणार, नाही का? यावर भाष्य केलं. त्यांनी यावेळी सांगितले की, 17 तारखेला शिवाजी पार्कवरच सभा आहे. पण ती आता होती म्हणावी लागेल. करण त्यासाठी सरकारकडून जी परवानगी मिळणं आवश्यक असतं, ती अजून मिळालेली नाही. फक्त दीड दिवस सभेसाठी उरला आहे. त्यात सभा करणं कठिण झालं आहे. त्यामुळे 17 नोव्हेंबरची सभा रद्द करत आहोत” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं.
‘ही निवडणूक म्हणजे तुमच्या-माझ्या स्वाभिमानाची लढाई’; धर्मराज काडादी यांचं विधान
मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीरनाम्यात पहिल्या भागात मूलभूत गरजा आणि जीवनमान या गोष्टींचा समावेश आहे. महिला, आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार आहे. तर दुसऱ्या भागामध्ये दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा,पर्यावरण, इंटरनेट इ. तर प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन हे विषय आहे. चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे, ते देखील पाहा असे राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
इतर पक्षांनी जाहीरनामे प्रकाशित केले आहेत. त्यांना खात्री आहे का ते विजयी होतील. बाकीचे लोकांनी माझ्या पेक्षा कमी उमेदवार उभे केले. कोणती युती घेऊन बसला. त्या युतीत वेगवेगळे पक्ष वेगवेगळे होर्डिंग्ज लावत आहेत. त्याचा विचार करा, असंही ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.
‘जनतेच्या पुण्याईवर अभिजीत पाटील विजय होतील’; खासदार ओमराजे निंबाळकर यांचं विधान