
फोटो सौजन्य - Social Media
समीर लवकरच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे ‘परांजपे उपाहार गृह’ या नावाने शुद्ध शाकाहारी उपाहारगृह सुरू करणार आहे. या उपक्रमाचा लोगो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, त्यामध्ये मिसळ-पाव, मेदू वडा, चहा यांसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची झलक पाहायला मिळते. ग्राहकांना अस्सल चवीचे शाकाहारी पदार्थ उपलब्ध करून देण्याचा त्याचा मानस असल्याचे या लोगोवरून स्पष्ट होते.
या नव्या प्रवासाची घोषणा करताना समीरने, “आम्ही येतोय… तुमच्या जिभेचे चोचले पुरवायला! लवकरच बार्शीकरांच्या सेवेत…” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे मुंबई किंवा पुण्याऐवजी बार्शीतच त्याचे पहिले उपाहारगृह सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ठाण्यात न्यूरोलॉजिकल आरोग्यसेवेला नवी दिशा; अभिनेत्री भाग्यश्रीच्या हस्ते विशेष क्लिनिक्सचे उद्घाटन
समीरच्या या निर्णयाचे चाहते आणि मराठी कलाविश्वातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. अभिनेत्री अक्षया नाईक, ऋतुजा बागवे, क्षमा देशपांडे, श्वेता मेहेंदळे तसेच अभिनेता संग्राम समेळ यांनी कमेंट्सद्वारे त्याला शुभेच्छा देत नव्या व्यवसायासाठी भरभरून सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, समीर परांजपे सध्या ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या मालिकेत आरकेची भूमिका साकारत आहे. या मालिकेत त्याच्यासोबत अभिनेत्री अनघा ठाकूर मुख्य भूमिकेत झळकत आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता समीर उद्योजक म्हणूनही नवी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत असून, त्याच्या या नव्या प्रवासाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.