Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा; ताशी 70 किमी वेगाने वारे वाहणार?

बारमेर परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि त्यासोबतच प्रचंड प्रमाणात वाळू हवेत उडाली. काही वेळातच वाळूचे हे ढग उंचावत जाऊन भव्य स्वरूप धारण करू लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 31, 2026 | 01:35 PM
Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,

Follow Us
Follow Us:

बारमेर : राजस्थानमधील हवामान अचानक बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळे, पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा दिला आहे. पाली, टोंक आणि भिलवाडा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सक्रिय राहतील आणि अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहू शकतात.

बारमेर परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि त्यासोबतच प्रचंड प्रमाणात वाळू हवेत उडाली. काही वेळातच वाळूचे हे ढग उंचावत जाऊन भव्य स्वरूप धारण करू लागले. संपूर्ण परिसर धुळीच्या प्रचंड लोटांनी वेढला गेला. वादळाच्या प्रभावामुळे दृश्यमानता कमी झाली, आकाशाचा रंग बदलला आणि सूर्यप्रकाशही फिका पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या भीषण वाळूच्या वादळाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

दरम्यान, वाळवंटी भागातील तीव्र उष्णता, कोरडी हवा आणि वातावरणातील दाबातील बदल यांमुळे अशा प्रकारची वाळूची वादळे निर्माण होतात. जोरदार वाऱ्यामुळे वाळूचे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात हवेत उडून दूरवर पसरतात आणि काही वेळातच भीषण वादळाचे रूप धारण करतात. बारमेरमधील या वादळाने पुन्हा एकदा वाळवंटी प्रदेशातील नैसर्गिक आव्हानांची जाणीव करून दिली असून, त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

ग्रामीण भागांना वादळाचा फटका

या वादळाचा फटका विशेषतः ग्रामीण भागांना बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही घरांचे नुकसान झाले तर वीज पुरवठ्याच्या यंत्रणेलाही मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. वादळामुळे अनेक भागांतील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून, नुकसानाचा प्राथमिक आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू

Web Title: A massive sandstorm has struck rajasthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Rajasthan News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.