
Monsoon arrive on 10 June at Maharashtra says IMD,
बारमेर : राजस्थानमधील हवामान अचानक बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळे, पाऊस, गारपीट आणि विजांचा कडकडाट होण्याचा इशारा दिला आहे. पाली, टोंक आणि भिलवाडा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सक्रिय राहतील आणि अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहू शकतात.
बारमेर परिसरात संध्याकाळच्या सुमारास अचानक वाऱ्याचा वेग वाढू लागला आणि त्यासोबतच प्रचंड प्रमाणात वाळू हवेत उडाली. काही वेळातच वाळूचे हे ढग उंचावत जाऊन भव्य स्वरूप धारण करू लागले. संपूर्ण परिसर धुळीच्या प्रचंड लोटांनी वेढला गेला. वादळाच्या प्रभावामुळे दृश्यमानता कमी झाली, आकाशाचा रंग बदलला आणि सूर्यप्रकाशही फिका पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात नुकत्याच आलेल्या भीषण वाळूच्या वादळाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. या वादळाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
दरम्यान, वाळवंटी भागातील तीव्र उष्णता, कोरडी हवा आणि वातावरणातील दाबातील बदल यांमुळे अशा प्रकारची वाळूची वादळे निर्माण होतात. जोरदार वाऱ्यामुळे वाळूचे सूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात हवेत उडून दूरवर पसरतात आणि काही वेळातच भीषण वादळाचे रूप धारण करतात. बारमेरमधील या वादळाने पुन्हा एकदा वाळवंटी प्रदेशातील नैसर्गिक आव्हानांची जाणीव करून दिली असून, त्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
ग्रामीण भागांना वादळाचा फटका
या वादळाचा फटका विशेषतः ग्रामीण भागांना बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, काही घरांचे नुकसान झाले तर वीज पुरवठ्याच्या यंत्रणेलाही मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. वादळामुळे अनेक भागांतील दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले असून, नुकसानाचा प्राथमिक आढावा घेण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
दिल्ली हादरली! राजधानीत 5 मजली इमारत पत्त्यांसारखी कोसळली; ढिगाऱ्याखाली मृत्यूशी झुंज सुरू