Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Arvind Kejriwal : ‘दिल्लीपासून बिहारपर्यंत …’, अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

बिहार विधानसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 03, 2025 | 09:11 PM
'दिल्लीपासून बिहारपर्यंत ...', अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

'दिल्लीपासून बिहारपर्यंत ...', अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला धक्का

Follow Us
Close
Follow Us:

बिहार विधानसभा निवडणुकीस अवघे काही महिने उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, ‘आम आदमी पार्टी बिहार विधानसभा निवडणूक कोणत्याही पक्षाशी युती न करता स्वतंत्रपणे लढवणार आहे, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Justice Varma Case : कॅश कांड घोटाळ्यावरील रिपोर्टमुळे न्यायमूर्ती वर्मा यांच्या अचडणीत वाढ, केंद्र सरकार महाभियोगाच्या तयारीत

गुजरात दौऱ्यावर असलेल्या केजरीवालांनी अहमदाबादमध्ये पक्षाच्या सदस्यता अभियानाच्या उद्घाटनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या विसावदर पोटनिवडणुकीचा दाखला देत सांगितलं की, ‘काँग्रेसपासून वेगळी निवडणूक लढून ‘आप’ने तिप्पट मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. ही जनतेची स्पष्ट प्रतिक्रिया आहे की ‘आप’ आता एक मजबूत पर्याय म्हणून लोकांपुढे उभी राहत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केजरीवालांनी काँग्रेसवर थेट निशाणा साधत म्हणाले की, “INDIA आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित होती. आता आपचा काँग्रेससोबत कोणताही युतीचा संबंध नाही. जर युती असती, तर काँग्रेसने गुजरातच्या विसावदर पोटनिवडणुकीत आमच्याविरोधात उमेदवार का उभा केला असता? आपची मतं फोडण्यासाठी काँग्रेसला भाजपने पाठवलं होतं”, असा दावा त्यांनी यावेळी केला.

“भाजप आणि काँग्रेस यांचं नातं म्हणजे प्रेमी-प्रेमिकेसारखं आहे – रात्री चोरीछुपे भेटतात.”, असा आरोप त्यांनी केला. विसावदर पोटनिवडणुकीत AAP चे उमेदवार गोपाल इटालिया यांनी भाजपचे किरीट पटेल यांचा १७,५८१ मतांनी पराभव केला, तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी राहिली. या विजयानंतर ‘आप’ने गुजरातमध्येही आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली केल्याचं चित्र आहे.

गुजरातविषयी बोलताना केजरीवाल म्हणाले, “AAP गुजरातमध्ये पूर्ण ताकदीनिशी लढेल आणि विजय मिळवेल. राजकारणात हार-जीत होत असते. पण आमचा आत्मविश्वास कायम आहे. पंजाबमध्ये पुन्हा आमचं सरकार येईल, यावर मला पूर्ण विश्वास आहे. तिथे आम्ही चांगलं काम केलं आहे.”

Karnataka CM : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांदरम्यान सिद्धारमय्यांची चतुर खेळी; दोन शहरांची नावंच बदलली

केजरीवालांच्या या घोषणेमुळे आप’ पक्ष आता राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र रणनीती स्वीकारतो आहे. काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांपासून अंतर ठेवत AAP आपली एक स्वतंत्र ओळख प्रस्थापित करू पाहतो आहे. आगामी बिहार आणि गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ची कामगिरी कशी असेल, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

बिहारमध्ये २०२५ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत NDA ने २४३ पैकी १२५ जागा जिंकत सत्ता स्थापन केली होती. मात्र, नंतर मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी भाजपचा हात सोडून RJD सोबत महागठबंधन सरकार बनवलं. मात्र जानेवारी २०२४ मध्ये नीतीश कुमारांनी पुन्हा एकदा मोठा राजकीय पलटवार करत RJD ला सोडचिठ्ठी देत NDA मध्ये पुनरागमन केलं आणि भाजपसोबत पुन्हा सरकार स्थापन केलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत बिहारमध्ये NDA विरुद्ध INDIA ब्लॉक अशी लढत अपेक्षित असताना ‘आप’ने युतीबाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय विरोधकांचं गणित बिघडवण्याची शक्यता आहे.

Web Title: Aap independent contest bihar election 2025 arvind kejriwal announcement latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • Aam Aadami Party
  • Arvind kejriwal
  • Bihar Election

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर
1

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?
2

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?

‘चूक दुसऱ्याची, मी स्पष्टीकरण का देऊ?; अखेर मतदान ओळखपत्रावरून तेजस्वी यादव यांनी सोडलं मौन
3

‘चूक दुसऱ्याची, मी स्पष्टीकरण का देऊ?; अखेर मतदान ओळखपत्रावरून तेजस्वी यादव यांनी सोडलं मौन

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार
4

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.