Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुक्रवारच्या नमाज पठणासाठी मिळणारी २ तासांची सुट्टी रद्द; ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय

इतर राज्यांच्या विधानसभेत किंवा लोकसभा सभागृहात नमाज पठण करण्यासाठी सुट्टी नाही. त्यामुळे विधानसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 30, 2024 | 06:23 PM
शुक्रवारचा नमाज पठण करण्यासाठी २ तासांची सुट्टी मिळणार नाही; आसाम सरकारचा मोठा निर्णय

शुक्रवारचा नमाज पठण करण्यासाठी २ तासांची सुट्टी मिळणार नाही; आसाम सरकारचा मोठा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.  आसाम राज्यात १९३७ पासून विधानसभेत शुक्रवारच्या दिवशी नमाज पठण करण्यासाठी दोन तासांची सुट्टी मिळत होती. दरम्यान आता मुख्यमंत्री हेमंत सरमा यांनी ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम विधानसभेत ही प्रथा मुस्लिम लीगचे सदस्य सय्यद सादुल्लाह यांनी सुरू केली होती. आता राज्य सरकारने ही प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आसाम विधानसभेचे अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी आभार मानले आहेत. १९३७ पासून सुरू असलेली प्रथा बंद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शुक्रवारच्या दिवशी नमाज पठणासाठी दोन तासांची सुट्टी यापुढे मिळणार नाही. आसाम विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी यांच्या बैठकीत हा निर्णय सर्वमताने घेण्यात आला. त्यानंतरच हा ब्रिटिशकालीन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

ब्रिटिशकाळापासून आसाम विधानसभेत दर शुक्रवारी नमाज पठण करण्यासाठी दोन तासांची सुट्टी दिली जात होती. दर शुक्रवारी दुपारी १२ ते २या वेळेस ही सुट्टी दिली जायची. मात्र आता हा निर्णय बदलण्यात आला आहे. आजच्या या बैठकीत या निर्णयावर सर्वांचे एकमत झाले आणि सर्व राजकीय पक्षाच्या आमदारांनी याला पाठिंबा दिला.

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, ”भारताच्या प्राचीन धर्मनिरपेक्ष मूल्ये कायम राखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये विधानसभा अध्यक्ष विश्वजित डेमरी आणि सर्व सदस्यांना माझे आभार.

By doing away with the 2 hour Jumma break, @AssamAssembly has prioritised productivity and shed another vestige of colonial baggage.

This practice was introduced by Muslim League’s Syed Saadulla in 1937.

My gratitude to Hon’ble Speaker Shri @BiswajitDaimar5 dangoriya and our…

— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) August 30, 2024

इतर राज्यांच्या विधानसभेत किंवा लोकसभा सभागृहात नमाज पठण करण्यासाठी सुट्टी नाही. त्यामुळे आसाम विधानसभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आसाम विधानसभेचे काम शुक्रवारी सकाळी ९ वाजता व इतर दिवशी ९.३० वाजता सुरू होयचे. मात्र हा नियम रद्द केल्याने शुक्रवारी देखील ९.३० वाजता विधानसभेचे काम सुरू होणार आहे. आसाम सरकारने हा महत्वाचा निणर्य घेतला आहे. आसाम विधानसभेची उत्पादकता वाढवण्यासाठी तसेच इतर कोणत्याही विधानसभेत असा नियम नसल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Web Title: Assam government has decided there will be no 2 hour break for namaz in the legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2024 | 06:09 PM

Topics:  

  • Assam
  • Assam News

संबंधित बातम्या

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज
1

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न होईल पूर्ण! महिला उमेदवारांनाही करता येणार अर्ज

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
2

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव
3

Assam flood : 50 मृत्यू, 1500 गावं पाण्याखाली; आसाममध्ये मुसळधार पाऊस अन् भूस्खलनाचा तांडव

आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक; यामुळे पुन्हा अराजकता अन् अशांततेची शक्यता
4

आसाम सरकार स्वतः देणार नागरिकांच्या हाती बंदूक; यामुळे पुन्हा अराजकता अन् अशांततेची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.