
'मामा'पुन्हा येणार? आसाममध्ये लवकरच निवडणूक लागणार; BJP गेम करण्याच्या तयारीत; थेट 25 जणांचे...
एप्रिल महिन्यात होऊ शकते आसाम निवडणूक
भाजप अनेक उमेदवारांची तिकिटे कापण्याचा अंदाज
भाजपसाठी असणार महत्वाची विधानसभा निवडणूक
Asaam BJP/गुवाहाटी: यंदाच्या वर्षात देशात अनेक राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. आसाम, तामिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर एप्रिल महिन्यात आसाममध्ये निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आसाम निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. मार्च महिन्यात आसामच्या निवडणुकीची घोषणा केली जाण्याचा अंदाज आहे. भाजपने देखील निवडणुकीची तयारी सुरु केल्याचे म्हटले जात आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोग आसाम विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करू शकते. तारखांची घोषणा आणि निवडणुकीचा निकाल यामध्ये किमान २५ ते ३० दिवसांचा कालावधी ठेवला जाण्याचा अंदाज आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आसाम निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होऊ शकते.
7000 रुपयांत करा कामाख्या देवीचे दर्शन; जाणून घ्या कुठे बुक करता येईल सर्वात स्वस्त टूर पॅकेज
मात्र आसाम विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे. गेली १० वर्षे आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. यंदाची निवडणूक जिंकून भाजप विजयाची हॅट्रिक साधणार का हे पाहणे आवश्यक असणार आहे. आसाममध्ये मुख्यमंत्री हीमंता बिसवा शर्मा यांच्या नेतृत्वातच निवडणूक लढवली जाणार आहे.
ज्या नेत्यांच्या कामगिरीचा रिपोर्ट चांगला नसेल आशा २५ ते ३० जणांचे तिकीट भाजपकडून कापले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या आमदाराला जनतेचा थोडा देखील विरोध दिसेल अशा नेत्याचे तिकीट कापले जाईल. भाजपने ही निवडणुकीसाठी दोन विभाग तयार केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम दौऱ्यावर; उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बैठक
पहिल्या टप्प्यात अवैध घुसखोरी, आसाम सरकारच्या विकास योजना, मोदी सरकारने आणलेल्या योजना असे मुद्दे असू शकतात. तर दुसरीकडे स्थानिक विषयांवर लक्ष दिले जाणार आहे. ग्रामीण भागपासून शहरी भागापर्यन्त भाजप सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आसाम विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार करताना दिसून येणार आहेत. आसाममध्ये एनडीएला ९० ते १०० जागा जिंकण्याचा विश्वास असल्याची चर्चा आहे. आगामी काळात भाजपसाठी पश्चिम बंगाल, आसाम या राज्यांमधील विधानसभा निवडणूक महत्वाच्या असणार आहेत.