Bomb threat by email to disaster management control room
मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकतेच युद्ध थांबले आहे. दोन्ही देशामध्ये युद्धबंदी सुरु असताना देशांतर्गत सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. देशाच्या सीमा भागातील राज्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मात्र देशात लवकरच बॉम्बस्फोट होणार असा धमकीचा मेल आहे. या धमकीच्या मेलमुळे देशात खळबळ उडाली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, देशात लवकरच बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा धमकीचा मेल आला आहे. तशी माहिती महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. सोबतच मुंबई पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. यामुळे राज्यासह देशामध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हा धमकीचा मेल आपत्ती व्यवस्थापनाच्या कंट्रोल रुमला आला आहे. याच मेलच्या अनुषंगाने सोमवार ते बुधवार या काळात सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. धमकीच्या मेलमुळे सगळीकडे सध्या खळबळ उडाली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. असे असतानाच हा मेल आल्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कोणतीही चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. युद्धबंदी असल्यामुळे सीमा भागातील राज्यांमध्ये सध्या तरी परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.
भारत पाकिस्तान युद्धाबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर येथील एअरबेसला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील जवानांचे कौतुक करुन सैन्याचे मनोबल वाढवले आहे. तसेच भारतीय वायू दलाने हल्लाही केला आणि रक्षण केले. शत्रूच्या हल्लामध्ये आपल्या एअर डिफेन्सला धक्काही पोहचला नाही. तुमच्या पराक्रमामुळे ऑपरेशन सिंदूरचे यश जगभरात पोहोचले. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याबद्दल मी देशाच्या सशस्त्र सलाम करतो. येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही प्रेरणा ठरला आहात. भारत गौतम बुद्धांची आहे तशीच गुरु गोविंदसिंग यांची देखील भूमी आहे. प्रत्येक नागरिक जवानांसोबत आहेत.भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा एकच परिणाम म्हणजे विनाश असेल हे दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मालकांना समजले असेल. पाकिस्तानचे अनेक प्रयत्न प्रत्येकवेळेस अपयशी ठरले” अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरमध्ये व्यक्त केल्या आहेत.