मध्य प्रदेशातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री मोहन यादव एका कार्यक्रमासाठी मंदसौर जिल्ह्यात गेले होते. याठिकाणी एका गरम हवेचा फुग्यात (Hot Air Balloon) स्वार होण्यासाठी गेले होते. पण फुगा फुगवताना अचानक फुग्याला आग लागली. यावेळी मोहन यादव यांच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सुरक्षितरित्य बाहेर काढले आणि पुढचा अनर्थ टळला. पण अचानक फुग्याला आग लागल्यामुळे त्याठिकाणी एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, फुग्याच्या खालच्या भागात आग लागली. मुख्यमंत्री पूर्णपणे सुरक्षित आहेत.
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “आज आम्ही गांधी सागर येथे गरम हवेचा फुगा पाहण्यासाठी आलो होतो. आज येथे खूप वारा आहे. वाऱ्यामुळे फुगा हवेत उडू लागतो. परंतु जेव्हा वाऱ्याचा वेग जास्त असतो तेव्हा पर्यटकांना काळजी घ्यावी लागते. फुगा उडण्यासाठी वेग पकडू शकत नाही. मी काल रात्रीपासून गांधी सागरच्या या पर्यटन स्थळावर आहे. आमच्या मध्य प्रदेशात अशी पर्यटन केंद्रे फार कमी आहेत, जिथे नैसर्गिक सौंदर्यासोबतच वनसंपदा देखील आहे.”
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, जेव्हा मुख्यमंत्री फुग्यात चढले तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी २० किलोमीटर होता. अशा परिस्थितीत फुगा पुढे जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या खालच्या भागात आग लागली. तर जिल्हाधिकारी अदिती गर्ग म्हणाल्या की, काही माध्यमांमध्ये फुग्याबाबत दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्यात आली आहे. फुग्याच्या सुरक्षिततेत कोणतीही चूक झालेली नाही. माननीय मुख्यमंत्री फक्त फुगा पाहण्यासाठी गेले होते.
गरम हवेचा फुगा, नावाप्रमाणेच, गरम हवेचा फुगा आहे. तो उडण्यास योग्य राहावा म्हणून, हवा गरम केली जाते, जेणेकरून फुगा वर येऊ शकेल आणि तरंगत राहील. या संपूर्ण प्रक्रियेत सर्व सुरक्षा मानकांचे पूर्णपणे पालन करण्यात आले आहे. नागरिकांना खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देऊ नका अशी विनंती आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव शुक्रवारी झाबुआमध्ये होते. त्यानंतर ते मंदसौरला पोहोचले आहेत. मुख्यमंत्र्यांनी झाबुआमध्ये एक मोठी घोषणा केली होती. त्यांनी सांगितले होते की दिवाळीनंतर लाडली बहाणा योजनेअंतर्गत मासिक आर्थिक मदत सध्याच्या १२५० रुपयांवरून १५०० रुपये केली जाईल.
झाबुआ येथील पेटलावड येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी योजनेच्या १.२६ कोटी महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १५४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केली. यावेळी त्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत दिवाळीनंतर लाभार्थ्यांना दरमहा १५०० रुपये मिळतील. २०२८ पर्यंत मदतीची रक्कम ३,००० रुपये केली जाईल.