
CJP Parliament March LIVE: कॉकरोच जनता पक्षाच्या (CJP) वतीने पुकारण्यात आलेला ‘संसद मार्च’ जंतर-मंतरवरून निघून थेट संसदेच्या आवाराजवळ पोहोचताच राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आंदोलक संसदेच्या परिसरात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन सोडल्याची माहिती समोर आली आहे.
जंतर मंतरवरून देशातील हजारो तरुण आणि विद्यार्थ्यांचा हा प्रचंड मोर्चा संसदेच्या वेशीवर धडकल्याने आधीच संपूर्ण परिसरात कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि धरपकड सुरू केली. याच दरम्यान, पंतप्रधानांचा ताफा संसद भवनातून बाहेर पडल्यानचे पाहायला मिळाले. यामुळे या आंदोलनाची तीव्रता आणि सरकारवरील वाढता दबाव स्पष्टपणे दिसून येत आहे. या राजकीय घडामोडीमुळे आंदोलनस्थळावरील वातावरण अधिकच तापणार असल्याचे चिन्ह दिसू लगले आहे.
CJP Parliament March LIVE: CJPचे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे कामकाजात व्यत्यय आला. लोकसभा आणि राज्यसभा सहा वेळा तहकूब करण्यात आली. विरोधी पक्षाचे खासदार नीट पेपरफुटी आणि राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंच्या चोरीवर चर्चेची मागणी करत होते. काही खासदार पोस्टर आणि बॅनर घेऊन सभागृहात घुसले.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेत जंतर मंतर येथील झुरळ जनता पक्षाच्या आंदोलनावर चर्चा केली. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच मल्लिकार्जुन खर्गे यांनी नीट प्रश्नपत्रिका फुटल्याचा मुद्दा उपस्थित केला. यानंतर मोठा गदारोळ झाला, ज्यामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले.
२० जुलै रोजी, विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच, विरोधी खासदारांनी नीट (NEET) आणि राम मंदिराच्या मुद्द्यांवर घोषणाबाजी सुरू केली. सभापती ओम बिरला यांनी शांततेचे आवाहन केले, परंतु गदारोळ सुरूच राहिला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाले आणि आता ते दुपारी २:३० वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
दरम्यान, सीजेपीच्या (CJP) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री अमित शाह यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही सीजेपीच्या आंदोलकांची आणि सोनम वांगचुक यांची प्रमुख मागणी आहे.
१९ जुलै रोजी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ४० पक्षांच्या ५८ नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षांनी राम मंदिर, नीट (NEET) आणि ई२० (E20) या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली. बैठकीसाठी २० बंडखोर टीएमसी खासदारांना (एनसीपीआय) आमंत्रित केल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षांनी सभात्याग केला.