Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yogi Adityanath: योगी सरकारचा मोठा निर्णय! UP मधील सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीत अनिवार्य

Vande Mataram mandatory in UP: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी UP मधील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 10, 2025 | 02:20 PM
CM Yogi Adityanath makes Vande Mataram mandatory in schools in Uttar Pradesh

CM Yogi Adityanath makes Vande Mataram mandatory in schools in Uttar Pradesh

Follow Us
Close
Follow Us:

Yogi Adityanath: उत्तर प्रदेश: राष्ट्रीय गान असलेल्या वंदे मातरम या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहे. वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. यानंतर आता वंदे मातरम गीताची 150 वर्षपूर्ती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी UP मधील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गाणे अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे.

उत्तर प्रदेशमधील कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ यांनी वंदे मातरम हे अनिवार्य करण्यात आले असल्याचे सांगितले आहे. योगी आदित्यनाथ यांनी यापुढे उत्तर प्रदेशमधील प्रत्येक शाळांमध्ये वंदे मातरम हे अनिवार्य असणार आहे. आता, राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये दररोज ‘वंदे मातरम्’ या गाण्याने सुरुवात होईल. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना ही प्रणाली तात्काळ लागू करण्याचे आणि सर्व शाळांमध्ये शिस्त, स्वच्छता आणि देशभक्तीचे वातावरण सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

वंदे मातरम 150 वर्षपूर्ती कार्यक्रमामध्ये योगी आदित्यनाथ यांनी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधला. योगी आदित्यनाथ म्हणाले की, “भारताच्या स्वातंत्र्याकडे नेणाऱ्या मंत्रालाच काँग्रेसने जातीयवादी म्हणत त्यात बदल करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे दुर्दैवाने १९४७ मध्ये देशाची फाळणी झाली. जर आपला विश्वास आपल्या राष्ट्रीय एकता आणि अखंडतेला अडथळे निर्माण करत असेल, तर आपण आपला विश्वास बाजूला ठेवला पाहिजे… काही लोकांसाठी, आजही, त्यांचा विश्वास आणि धर्म भारताच्या एकता आणि अखंडतेपेक्षा अधिक महत्त्वाचा बनतो… जर भारतात नवीन प्रकाश उदयास येण्याचे धाडस करत असेल, तर आपण त्याला भारताच्या अखंडतेला आव्हान देण्यापूर्वीच पुरले पाहिजे,” असा आक्रमक पवित्रा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे ते म्हणाले की, “व्यक्ती, जाती, पंथ आणि धर्म राष्ट्रापेक्षा मोठे असू शकत नाहीत. भारताच्या अखंडतेचे शिल्पकार, लोहपुरुष, “भारतरत्न” सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती सोहळ्याचा भाग म्हणून आज गोरखपूरमध्ये आयोजित “एकता यात्रेत” सहभागी झालो आणि एकत्रितपणे “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत गायले. ही “एकता यात्रा” राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आयोजित केली जाणार आहे. आम्हाला विश्वास आहे की ही यात्रा व्यापक जनजागृती करेल, स्वदेशी (स्वावलंबन) वाढवेल आणि प्रत्येक नागरिकामध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करेल,” असे देखील योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.

Web Title: Cm yogi adityanath makes vande mataram mandatory in schools in uttar pradesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • CM Yogi Adityanath
  • up news
  • vande mataram

संबंधित बातम्या

वंदे मातरम् – स्वातंत्र्य लढ्यातील एक हुंकार, जाणून घ्या कसे बनले राष्ट्रीय गीत
1

वंदे मातरम् – स्वातंत्र्य लढ्यातील एक हुंकार, जाणून घ्या कसे बनले राष्ट्रीय गीत

Vande Mataram: भारताच्या अमर आत्म्याचा आवाज…! वंदे मातरमच्या १५० वर्षेपूर्ती दिनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे खास पत्र
2

Vande Mataram: भारताच्या अमर आत्म्याचा आवाज…! वंदे मातरमच्या १५० वर्षेपूर्ती दिनी मल्लिकार्जुन खर्गे यांचे खास पत्र

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम गीता’वरून भाजप युवा मोर्चा आक्रमक; ‘या’ आमदारांच्या मतदारसंघात होणार समुहगायन
3

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम गीता’वरून भाजप युवा मोर्चा आक्रमक; ‘या’ आमदारांच्या मतदारसंघात होणार समुहगायन

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात
4

Mangal Prabhat Lodha: ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्ष पूर्ण; फडणवीसांच्या उपस्थितीत मंत्रालयात महोत्सवाची सुरूवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.