Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पर्यटक सरकारच्या भरवश्यावर अन् सरकार देवाच्या…; प्रियांका गांधी सत्ताधाऱ्यांवर कडाडल्या

Priyanka Gandhi Parliament speech : संसदेच्या पावसाळी अधिवेशनमध्ये सध्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. मात्र पहलगाम हल्ला झालाच कसा असा मुख्य प्रश्न कॉंग्रे खासदार प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 29, 2025 | 03:53 PM
Congress MP Priyanka Gandhi's Parliament speech targets Modi government over Pahalgam attack

Congress MP Priyanka Gandhi's Parliament speech targets Modi government over Pahalgam attack

Follow Us
Close
Follow Us:

Priyanka Gandhi Parliament speech : नवी दिल्ली : सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. पहलगाम हल्ल्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले असून वादंग निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये पाकिस्तानच्या नापाक हालचाली आणि विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संसदेमध्ये भाषण केले. प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणामध्ये सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

खासदार प्रियांका गांधी या संसदेमध्ये कडाडल्या आहेत. खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “भारतीय सैन्य हे कडाक्या थंडीमध्ये देखील सीमेवर देशाचे रक्षण करत असतात त्यांच्या कार्याला माझा सलाम आहे. देशासाठी बलिदान देण्यासाठी सैनिक नेहमी तप्तर असतात. ज्या दिवशी 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ला झाला तर तो का झाला हे सांगण्यात आलं नाही. हे लोक काश्मीरमध्ये करत काय होते? सरकार काश्मीरमध्ये दहशतवाद संपला आहे असा प्रचार करत होते. काश्मीरमध्ये शांतता आहे असं सांगण्यात येत होतं तर असा हल्ला झाला कसा?” असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

पुढे त्या म्हणाल्या की, “पहलगाम हल्ल्यामध्ये कोणला पत्नीसमोर तर कोणाला बहिणीसमोर मारुन टाकण्यात आले. 26 लोकांवर गोळीबार करण्यात आला. एक तास भारतीयांना निवडून मारत असताना यावेळी एकही सुरक्षा रक्षक याठिकाणी आला नाही. त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? तिथेही एकही सैनिकाची नियुक्ती का नव्हती? सरकारला माहिती नव्हते का की याठिकाणी रोज 1500 हून अधिक पर्यटक येत असतात. तिथे डॉक्टर, सुरक्षा, फर्स्ट एड कशाचीच सुविधा नव्हती. पर्यटक लोक सरकारच्या भरवश्यावर त्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. मात्र सरकारने त्या लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडले होते,” असा घणाघात खासदार प्रियांका गांधी यांनी केला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

हे पंतप्रधानांच्या गैर जबाबदाराचे सर्वात मोठे प्रतिक

पुढे खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “गृहमंत्रालयाने या हल्ल्याची जबाबदारी घ्यावी. या देशावर हल्ला झाला तर संसदेमध्ये असणारा प्रत्येक व्यक्ती सरकारच्या पाठीशी उभा असेल. आणि यावेळी देखील आम्हाला सैन्यावर अभिमान आहे की त्यांनी शौर्याने लढाई लढली. आपलं सैन्य सीमेवर लढलं आणि श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना घ्यायचं आहे. सैनिकांच्या लढ्याचे आणि ऑलिंपिकच्या मेडलचे देखील पंतप्रधान श्रेय घेतात. नेतृत्व हे फक्त श्रेय घेऊन नाही तर जबाबदारी घेऊन होत असते. देशाच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा झाले की लढाई होता होता अचानक थांबली. ही लढाई थांबवण्याची घोषणा सरकार किंवा सैन्य करत नाही तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करत आहेत. हे आपल्या पंतप्रधानांच्या गैर जबाबदाराचे सर्वात मोठे प्रतिक आहे,” अशा खडक शब्दांत प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

Web Title: Congress mp priyanka gandhis parliament speech targets modi government over pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 03:26 PM

Topics:  

  • Opreation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack
  • Priyanka Gandhi

संबंधित बातम्या

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र
1

Priyanka Gandhi News: बिहारचे ७० हजार कोटी कुठे गायब झाले…? चंपारणमधून प्रियांका गांधींचा पंतप्रधानांवर टिकास्त्र

बहीण-भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची वादग्रस्त टीका; म्हणाले, “विरोधी पक्षनेते बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस..”
2

बहीण-भावाच्या नात्यावर भाजप नेत्याची वादग्रस्त टीका; म्हणाले, “विरोधी पक्षनेते बहिणीला सार्वजनिक ठिकाणी किस..”

चक्क भाजपने केली पूर्ण कॉंग्रेसची मागणी ! प्रियांका गांधींनी जेपी नड्डांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश
3

चक्क भाजपने केली पूर्ण कॉंग्रेसची मागणी ! प्रियांका गांधींनी जेपी नड्डांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत;  प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप
4

Bihar News: देशभरात ‘मत चोरी’चे कट रचले जात आहेत; प्रियांका गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.