Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकीकडे पाकिस्तानच्या नापाक हरकती थांबेना; तर दुसरीकडे महबुबा मुफ्तींना झाले अश्रू अनावर

भारत पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे जम्मू काश्मीरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये काश्मीरमधील सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याची भावना महबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केल्या आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: May 09, 2025 | 03:14 PM
Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti's reaction on India-Pakistan war

Former Jammu and Kashmir Chief Minister Mehbooba Mufti's reaction on India-Pakistan war

Follow Us
Close
Follow Us:

श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले आहे. यामुळे देशातील सीमा भागातील राज्यामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. भारताने दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर नापाक कृती करत पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर हल्ला केला. यामध्ये जम्मू-काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरात या राज्यांवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्य पूर्ण ताकदीने लढा देत आहे. मात्र मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीरच्या लोकांची काळजी व्यक्त केली आहे.

भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत चालला आहे. यामध्ये नागरिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी दोन्ही देशांना त्वरित चर्चा सुरू करण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत भारत आणि पाकिस्तान अर्थपूर्ण संवाद साधत नाहीत तोपर्यंत काश्मीरमधील परिस्थिती बिघडतच जाईल, अशी भूमिका मेहबूबा मुफ्ती यांनी मांडली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्या म्हणाल्या की, “भारत एक उगम पावणारी शक्ती आहे आणि पाकिस्तान आर्थिकदृष्ट्या मागे पडत चालला आहे. दोन्ही देशांनी स्वतःला विनाशाच्या दिशेने ढकलणं थांबवायला हवं. जम्मू-कश्मीरमधील लोक, विशेषतः सीमावर्ती भागातील लोक दररोज संघर्ष करत आहेत.” असे म्हणत भावूक होत मेहबूबा मुफ्ती यांना अश्रू अनावर झाले.

भारत पाक युद्धासंबंधित अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

पुढे त्या म्हणाल्या की, “आपल्या मातांना अजून किती काळ यातना सहन कराव्या लागणार? आतंकी तळ नष्ट करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण झाले आहे आणि आता हे युद्ध थांबले पाहिजे. आपण जगण्यावर आणि इतरांना जगू देण्यावर विश्वास ठेवायला हवा. लोकांनी दाखवून दिलं की पहलगाम हल्ल्याने आपल्याला किती खोलवर परिणाम केला होता, पण आता या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. युद्ध कधीच कोणतंही समाधान नसतं आणि आता राजकीय तोडग्याचा काळ आला आहे, अशी भूमिका जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री होत मेहबूबा मुफ्ती यांनी घेतली आहे.

दोन्ही देशांकडे अणुशक्ती…

मेहबूबा मुफ्ती पुढे म्हणाल्या की, “माध्यमं खोटी गोष्ट का पसरवत आहेत? प्रचारालाही एक मर्यादा असते आणि दोन्ही बाजूंनी मीडिया नकारात्मक भूमिका बजावत आहे. आपण पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि दोन्ही देशांकडे अणुशक्ती आहे. मला भीती वाटते की हे युद्ध जर अणुयुद्धात बदलले, तर काहीच उरणार नाही. केवळ निरपराध लोकच मारले जातील.”

Web Title: Former jammu and kashmir chief minister mehbooba muftis reaction on india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Jammu Kashmir News
  • Operation Sindoor news

संबंधित बातम्या

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
1

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
2

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
3

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे
4

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.