Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gujrat riots 2002: …तर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते; २००२ च्या गुजरात दंगलींवर शीख नेत्याचा खळबळजनक दावा

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्यावेळी कौतुकास्पद होती. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सर्व मारल्या गेलेल्या कारसेवकांचे अंत्यसंस्कार तिथेच करावेत असा निर्णय घेतला

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 27, 2025 | 03:21 PM
Gujrat riots 2002: …तर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते; २००२ च्या गुजरात दंगलींवर शीख नेत्याचा खळबळजनक दावा
Follow Us
Close
Follow Us:

Gujrat riots 2002: गुजरात राज्यात २००२ साली साबरमती एक्सप्रेसला लागलेली आग आणि त्यानंतर झालेल्या दंगलीचे पडसाद केवळ गुजरातच नव्हे तर देशातही उमटले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. २००२ साली झालेल्या गुजरात दंगलींवर माजी राज्यसभा खासदार तरलोचन सिंह यांनी त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केलं आहे.

ANI या वृ्त्तसंस्थेशी बोलताना तरलोचन सिंह म्हणाले की, गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल साबरमती एक्सप्रेस आगीच्या घटनेच्या रागाचा परिणाम होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी ती चांगल्या प्रकारे हाताळली नाहीतर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते. ट्रेनमध्ये जिवंत जाळलेल्या लोकांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी घेऊन जाऊ इच्छित होते, परंतु नरेंद्र मोदींनी त्यांचे अंत्यसंस्कार तिथेच केले. जर हे मृतदेह त्यांच्या गावी पोहोचले असते तर लोक किती संतप्त झाले असते. असे झाले असते तर संपूर्ण गुजरात जळून खाक झाले असते, याची कल्पना करा, परंतु नरेंद्र मोदींनी धाडस दाखवले आणि हे होऊ दिले नाही, असा खळबळजनक दावा तरलोच सिंह यांनी केला.

भारताचा अमेरिकेला थंड प्रतिसाद; PM मोदी ट्रम्पचा फोन का टाळतायत? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

मी २००२ मध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष होतो. गुजरात दंगली १९८४ च्या दिल्लीतील दंगलींप्रमाणे सरकार पुरस्कृत नव्हत्या. जनतेच्या संतापामुळे २००२ च्या दंगली घडल्या. त्यात सरकारची कोणतीही भूमिका नव्हती, असंही सिंह यांनी नमुद केलं. २००२ च्या गुजरात दंगलींमध्ये नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या दंगलींवरून काँग्रेसने अनेकदा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोपही केले आहेत.

तरलोचन सिंह म्हणाले की, ही घटना घडल्यानतंर पोहोचणाऱ्या पहिल्या लोकांमध्ये मी होतो. मी या घटनेची चौकशी केली. कोणालाही त्याबद्दल माहिती नव्हती. मी २००० मध्ये अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष झालो आणि २००२ मध्ये गुजरात दंगली झाल्या. मी गुजरात दंगलींवर एक पुस्तिका देखील लिहिली आहे. ही पुस्तिका देखील छापण्यात आली होती आणि नरेंद्र मोदींनी त्याच्या ५०० प्रती वाटल्या. मी दिल्लीतील शीख दंगलींची तुलना गुजरात दंगलींशी केली होती. दिल्ली दंगली सरकार पुरस्कृत होत्या, परंतु गुजरात दंगली ही जनतेच्या संतापाची अभिव्यक्ती होती. त्या दंगलीमध्ये सरकार किंवा त्यांच्या कोणत्याही माणसाची भूमिका नव्हती. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Mumbai Crime: संतापजनक! तीन अल्पवयीन मुलींसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत; मुंबईतील घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना तरलोचन सिंह म्हणाले की, “गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका त्यावेळी कौतुकास्पद होती. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी सर्व मारल्या गेलेल्या कारसेवकांचे अंत्यसंस्कार तिथेच करावेत असा निर्णय घेतला. जर ते मृतदेह गावांमध्ये पोहोचले असते तर किती संताप निर्माण झाला असता याची आपण कल्पनाच करू शकतो. संपूर्ण गुजरात पेटला असता, पण नरेंद्र मोदींनी धाडस दाखवून परिस्थिती हाताळली. परिणामी ही दंगल फक्त अहमदाबाद आणि त्याच्या आसपासच्या भागातच झाल्या. संपूर्ण गुजरातमध्ये परिस्थिती बिघडली नाही.

Web Title: Gujrat riots 2002 gujrat riots 2002 then the whole of gujarat would have been burnt sikh leaders sensational claim on the 2002 gujarat riots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.