Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक मंदिर अन् एक इंचही सोडणार नाही…; मंदिर-मशीद वादावर हरिशंकर जैन यांचा मोठा दावा

देशातील अनेक भागामध्ये मंदिर मशीद वाद सुरु असल्याचे दिसून येत आहे. सध्या मथुरेच्या मशीदीचा वाद सुरु असताना याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांनी भारतातील मंदिरांबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 29, 2024 | 04:25 PM
Hari Shankar Jain commented on the temple-mosque controversy

Hari Shankar Jain commented on the temple-mosque controversy

Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : देशामध्ये हिंदू मंदिर आणि मुस्लीम मशीद या मुद्द्यांवरुन वाद सुरु आहेत. अनेक मशीद या मंदिर पाडून बववल्या असल्याचे आरोप देखील केले जात आहेत. त्यामुळे अनेक मशीदींची सर्वेक्षणे सुरु आहेत. अयोध्येच्या राम मंदिरानंतर अशा अनेक मंदिरांचा मुद्दा प्रकाशात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वक्तव्यानंतर आता काशी, मथुरा, भोजशाळा, संभल येथील याचिकाकर्ते हरी शंकर जैन यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे.

हरी शंकर जैन यांनी भारतातील महत्त्वाच्या मंदिरांबाबत याचिका दाखल केलेली आहे. त्यांनी एका वाहिनीशी संवाद साधताना हिंदू मंदिर परत मिळवणार असल्याचा निश्चय पुन्हा एकदा व्यक्त केला आहे. यावेळी हरी शंकर जैन म्हणाले की, “ना एक मंदिर सोडणार, ना एक इंच सोडणार, ना कुणाला समजावणार, ना कुणाला समजणार. देवाच्या नावाने घेतलेला संकल्प कधीच करारात मोडत नाही,” असा आक्रमक पवित्रा हरी शंकर जैन यांनी घेतला आहे.

महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माध्यमांशी संवाद साधताना हरीशंकर जैन म्हणाले की, “मशीद बांधण्यासाठी जे काही मंदिर पाडले आहे, त्यातील एकही मंदिर किंवा एक इंचही शिल्लक राहणार नाही. तीन देणे आणि बाकीचे सोडणे ही विचारधारा गुलामगिरीचे लक्षण आहे. यामधून ही आक्रमणकर्त्यांची भीती दर्शवते, असा दावा हरी शंकर जैन यांनी केला आहे. त्याचप्रमाणे मूठभर लोक संपूर्ण हिंदू समाजाचे प्रतिनिधित्व करू शकत नाहीत आणि ते तडजोड करतील,” असे स्पष्ट मत हरी शंकर जैन यांनी व्यक्त केले आहे.

अयोध्या, काशी आणि मथुरेचे विशेष महत्त्व

हरिशंकर जैन यांच्या म्हणण्यानुसार, “जे हिंदू आज तडजोडीबद्दल बोलत आहेत ते स्वतःच्या पायावर गोळी झाडत आहेत. ज्याप्रमाणे अयोध्या काशी मथुरेचे स्वतःचे महत्त्व आहे, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांसाठी इतर मंदिरांचेही महत्त्व आहे. मंदिर पाडून आज जी मशीद बांधली गेली. अशा परिस्थितीत जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत कायदेशीर लढाई लढून आज मशिदीत रूपांतरित झालेली 5 हजार, 10 हजार मंदिरे परत घेईन,” असा इशारा हरी शंकर जैन यांनी दिला आहे.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 ना कोणाला समजावता येईल ना आम्हाला समजेल

हरीशंकर जैन यांनी सर्व मंदिरे परत घेण्याचा संकल्प केला आहे. ते म्हणाले की, “देवाच्या नावाने घेतलेला ठराव कराराने मोडता येत नाही. अशा परिस्थितीत तो आपल्याला समजू शकतो, असे जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. ना कोणी समजावणार ना आम्हाला समजणार. जे तडतोड करत आहेत ते लोकं इतिहासावर अन्याय करत असून त्यांना इतिहास कधीही माफ करणार नाही,” असे मत हरी शंकर जैन यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Hari shankar jain commented on the temple masjid mathura gyanvapi controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • Ayodhya ram mandir
  • mathura

संबंधित बातम्या

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?
1

Rajnath Singh in Ayodhya : ‘ऑपरेशन सिंदूरवेळी, भारताने भगवान रामाच्या प्रतिष्ठेचे पालन केले…’, संरक्षण मंत्री नेमकं म्हणाले काय?

Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा
2

Welcome 2026 : नवीन वर्षाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्री भाविकांची अलोट गर्दी; 2 किलोमीटरच्या दर्शन रांगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.