Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मणिपूर-अरुणाचल आणि नागालँडमध्ये अस्थिरता कायम! AFSPA 6 महिन्यांसाठी वाढवण्याचे गृह मंत्रालयाचे आदेश

मणिपूरमध्ये AFSPA लागू करणे हे महत्त्वाचे आहे कारण गेल्या दोन वर्षांपासून तेथे हिंसाचार सुरू आहे. तेथील वाढत्या हिंसाचारामुळे सहा महिने AFSPA वाढवण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 30, 2025 | 05:48 PM
Home Ministry decides to extend AFSPA by six months as Manipur violence situation

Home Ministry decides to extend AFSPA by six months as Manipur violence situation

Follow Us
Close
Follow Us:

मणिपूर-अरुणाचल आणि नागालँडमध्ये AFSPA 6 महिन्यांसाठी वाढवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, मणिपूरमधील १३ पोलिस स्टेशन वगळता सर्व भागात AFSPA लागू करण्यात आला आहे. नागालँडमधील ८ जिल्ह्यांमध्ये सशस्त्र दलांनाही विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, अरुणाचल प्रदेशातील तीन जिल्ह्यांमध्ये AFSPA 6 महिने लागू राहील.

आता, मणिपूरमध्ये AFSPA लागू करणे महत्त्वाचे आहे कारण गेल्या दोन वर्षांपासून तेथे हिंसाचार सुरू आहे. कधीकधी हिंसाचाराचे प्रमाण हे कमी किंवा जास्त असू शकते. मात्र परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली नाही. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यापासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, परंतु परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. म्हणूनच एफएसपी वाढवणे ही परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गृहमंत्रालयाचे म्हणणे तरी काय?

गृह मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, मणिपूरच्या काही भागात अशांतता आणि हिंसाचाराची परिस्थिती लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात आले आहे. AFSPA अंतर्गत, सशस्त्र दलांना कोणत्याही संशयिताला अटक करण्याचा, शोध घेण्याचा आणि आवश्यक असल्यास गोळीबार करण्याचा अधिकार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि शांतता सुनिश्चित करण्यासाठी या अधिकारांना महत्त्व दिले जाते, विशेषतः अशा वेळी जेव्हा राज्यात विविध दहशतवादी गट आणि फुटीरतावादी प्रकरण समोर येत आहेत.

AFSPA कायदा म्हणजे काय?

कोणत्याही क्षेत्रात AFSPA कायदा लागू करणे म्हणजे तो परिसर अशांत क्षेत्र म्हणून घोषित करणे. 1942  मध्ये भारत छोडो आंदोलनाला प्रतिसाद म्हणून ब्रिटिश सरकारने AFSPA कायदा लागू केला. स्वातंत्र्यानंतर, पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी हा कायदा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि 1958 मध्ये तो कायद्याच्या रूपात लागू करण्यात आला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

AFSPA कायदा अजूनही या भागांमध्ये लागू आहे

AFSPA कायदा आजही देशातील काही भागांमध्ये लागू आहे. यामध्ये ईशान्येकडील राज्ये, जम्मू आणि काश्मीर आणि पंजाबमध्ये दहशतवाद शिगेला पोहोचला असताना लागू करण्यात आला. यानंतर, पंजाब हे पहिले राज्य होते जिथून ते काढून टाकण्यात आले. त्यानंतर, त्रिपुरा आणि मेघालय या ईशान्येकडील राज्यांमधूनही ते काढून टाकण्यात आले, परंतु नागालँड, मणिपूर, आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागात हा कायदा अजूनही लागू आहे. राज्यातील परिस्थिती निवळण्यानंतर किंवा नियंत्रणामध्ये आल्यानंतर कायदा मागे घेण्याचा विचार केंद्रीय गृहमंत्र्याकडून घेण्यात येईल. मात्र सध्या तरी परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे सहा महिन्यांसाठी यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Web Title: Home ministry decides to extend afspa by six months as manipur violence situation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 05:48 PM

Topics:  

  • Amit Shah
  • indian army
  • Manipur Violence

संबंधित बातम्या

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक
1

130th Amendment Bill 2025: पंतप्रधानांपासून नगरसेवकांपर्यंत द्यावा लागणार राजीनामा; संसदेत सादर होणार ‘हे’ नवे विधेयक

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट
2

Vice President Election: देशाचे पुढचे उपराष्ट्रपती राज्यपालांपैकी कोण? अनेक राज्यपाल आणि उपराज्यपालांनी घेतली मोदी-शाह यांची भेट

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’
3

७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लष्कराने घेतली विशेष खबरदारी! नियंत्रण रेषेवर ‘३-स्तरीय सुरक्षा कवच’ तयार; शत्रूंसाठी ठरणार ‘काळ’

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
4

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.