Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार कसे होणार? ‘हे’ आहेत पारशी समाजात त्याचे नियम

टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पारशी समाजातील अंत्यसंस्काराची प्रक्रिया काय असते? कशा प्रकारे अंत्यसंस्काराची प्रक्रिया असते ते जाणून घेऊया.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 10, 2024 | 12:37 PM
रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार कसे होणार? ‘हे’ आहेत पारशी समाजात त्याचे नियम
Follow Us
Close
Follow Us:

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने देशावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली आहे. रतन टाटा हे पारशी समाजाचे होते. मात्र त्यांच्या पार्थिवावर हिंदू परंपरेनुसार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यामुळे पारशी समाजातील अंत्यसंस्काराची प्रक्रिया काय असते? कशा प्रकारे अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पडली जाते? ते जाणून घेऊया.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की, भारताचे बहुमूल्य ‘रतन’ असलेल्या रतन टाटा यांना पूर्ण राज्य सन्मानाने अंतिम निरोप देण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मात्र पारशी धर्मात अंत्यसंस्काराची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. पारशी समाजात अंतिम संस्कार कसे केले जातात ते जाणून घेऊया.

पारशी समाजातील अंत्यसंस्कार परंपरा

पारशी समाजातील अंत्यसंस्कार परंपरा खूप जुन्या आणि अनोख्या आहेत. या समाजात मृतदेह जाळला जात नाही किंवा पुरला जात नाही. पारसी मानतात की मृत्यूनंतर शरीर निसर्गाकडे परत केले पाहिजे. म्हणूनच ते ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ किंवा ‘दखमा’ नावाची एक खास वास्तू बनवतात आणि त्यात मृत व्यक्तीला ठेवले जाते.

हे देखील वाचा : उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनावर परदेशी मीडियाच्याही प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले ते

‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणजे काय?

टॉवर ऑफ सायलेन्स ही एक खुली, गोलाकार रचना आहे, ज्यामध्ये मध्यभागी एक खड्डा आहे. या खड्ड्यात मृतांचे मृतदेह ठेवले जातात. आजूबाजूचे पक्षी हे मृतदेह खातात आणि त्यामुळे शरीर निसर्गात परत येते. वास्तविक पारशी लोकांचा असा विश्वास आहे की आकाश, पृथ्वी आणि अग्नी पवित्र आहेत, म्हणून मृत शरीर यापैकी कोणत्याहीमध्ये मिसळू नये. पारशी समाजाची ही पद्धत पर्यावरणासाठीही फायदेशीर मानली जाते कारण त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन किंवा प्रदूषण वापरले जात नाही. मात्र आता फार कमी लोक ही जुनी परंपरा स्वीकारत आहेत.

रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार कसे होणार? ‘हे’ आहेत पारशी समाजात त्याचे नियम ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

शेवटची आदरांजली कुठे देऊ शकतो?

रतन टाटा यांचे पार्थिव कुलाबा येथील त्यांच्या घरी आणण्यात आले आहे. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स हॉलमध्ये ठेवण्यात येणार आहे. जेथे सर्वसामान्य नागरिकांना सकाळी 10 ते दुपारी 3.30 या वेळेत त्यांचे अंतिम दर्शन घेता येणार आहे. अंतिम दर्शनानंतर रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वरळी येथील स्मशानभूमीत आणण्यात येणार आहे. सायरस मिस्त्री यांच्यावरही येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

हे देखील वाचा : अँटिलियाच्या तुलनेत आलिशान ‘बख्तावर’ किती वेगळं? जाणून घ्या रतन टाटांच्या घराचा खास इतिहास

मुंबई पोलिसांच्या ऑनर गार्ड टीमने एबीपी न्यूजला सांगितले की, रतन टाटा यांना त्यांच्या घराबाहेर सलामी दिली जाईल. विशेष म्हणजे मुंबई पोलीस बँडमध्ये एकूण 23 जण आहेत. 23 लोकांपैकी 21 लोक बँडमध्ये वेगवेगळी वाद्ये वाजवतात आणि दोन रक्षक आहेत. येथेच रतन टाटा यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळले जाणार आहे.

 

Web Title: How will ratan tata be cremated these are its rules in parsi society nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • Ratan Tata Death

संबंधित बातम्या

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?
1

Tata Trusts : 36 वर्ष जुन्या Share Transfer वरुन वाद; नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांना नोटिसा, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.