Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tej Pratap Yadav : ‘माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका’; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. मला असुरक्षित वाटत असल्यामुळे माझी सुरक्षा वाढवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 23, 2025 | 04:28 PM
'माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका'; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

'माझ्या चारी बाजूंनी शत्रू, माझ्या जिवाला धोका'; तेज प्रताप यांच्या दाव्याने बिहारमध्ये खळबळ

Follow Us
Close
Follow Us:

वादग्रस्त विधाने आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत राहणारे तेज प्रताप यादव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण यावेळी प्रकरण आणखी गंभीर आहे. आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेज प्रताप यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. ‘मला सध्या असुरक्षित वाटत आहे, माझी सुरक्षा वाढवावी, असं माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान तेज प्रताप यांच्या या विधानाने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Bypoll Results 2025 : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये ‘आप’ ची मुसंडी, विसावदर जागेवर मिळवला मोठा विजय

अलिकडेच तेज प्रताप यादव यांनी अनुष्का यादवसोबतचे त्यांचे नाते जाहीरपणे स्वीकारले होते. त्यानंतर, या नात्यामुळे संतापलेल्या लालू यादव यांची कुटुंब आणि पक्षातून हकालपट्टी केली होती. आता तेज प्रताप स्वतः सुरक्षित नाही नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात असा प्रश्न उपस्थित झाला आहे की हा फक्त कौटुंबिक वाद आहे की यामागे मोठं राजकारण दडलंय.

माध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, ‘सध्या मला असुरक्षित वाटत आहे,. मी सरकारला माझी सुरक्षा वाढवण्याची विनंती करतो. आमचे शत्रू सर्वत्र आहेत. माझ्या जीवाला धोका आहे.’

तेज प्रताप यादव त्यांचे वडील आणि भाऊ तेजस्वी यादव यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले, ‘वडिलांना माझ्या शुभेच्छा. त्यांना माझंही आयुष्य लाभूदे. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. तेजस्वी पुढे जातील, बिहारचे मुख्यमंत्री बनतील, हा माझा आशीर्वाद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sonia Gandhi : ‘योग्य भूमिका घ्या, अजूनही वेळ गेली नाही’; इस्रायल-इराण युद्धावरून सोनिया गांधींनी मोदी सरकारला फटकारलं

येत्या काही महिन्यात बिहार विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावरून राजकारण तापू लागलं असतानाच तेज प्रताप यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यात त्यांनी अनुष्का यादव सोबतचं नातं स्वीकारल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर लगेचच ही पोस्ट त्यांनी डिलिटही केली. मात्र तोपर्यंत ही पोस्ट व्हायरल झाली होती. त्याच्या या पोस्टने बिहारच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर लगेच त्यांची आरजेडीतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाय कुटुंबातूनही बाहेर काढल्याचं सांगितलं जात होतं. दरम्यान आज त्यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या बिहार विधानसभेच्या निवडणुका, आरजेडीतून हकालपट्टी या सर्व गोष्टींचा या प्रकरणाशी संबध तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Lalu prasad yadav son tejpratap yadav feels unsafe demand security bihar politics latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 04:28 PM

Topics:  

  • Bihar Election
  • Lalu Prasad yadav
  • Tejaswi Yadav

संबंधित बातम्या

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
1

Rahul Gandhi News: ‘ज्या दिवशी इंडिया आघाडीचे सरकार येईल, तेव्हा…’; आयोगाच्या इशाऱ्यानंतरही वार राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार
2

बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन ओळखपत्रं,आयोगाचा अजब कारभार

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर
3

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?
4

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.