Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले

  • By anuradha sagar
Updated On: Aug 11, 2025 | 02:26 PM
LiveUnstoppable: निवडणूक आयोगाकडून संदेश..; चर्चेसाठी ३० जणांना आमंत्रण, कोण कोण जाणार?
Follow Us
Follow Us:

LiveUnstoppable:  मतचोरीच्या प्रकरणावरून सध्या देशात राजकारण तापले असून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील फेरफारीवरून गंभीर आरोप केले आहेत. याविरोधात आज (११ ऑगस्ट) विरोधी पक्षाचे खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. पण पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षाच्या खासदारांना ताब्यात घेत त्यांचा मोर्चा अडवला. पोलिसांनी खासदारांच्या मोर्चाला निवडणूक आयोगाकडे जाण्यापासून रोखले. पण त्यानंतरही विरोधी खासदार चांगलेच आक्रमक झाले, विरोधी खासदारांनी घोषणाबाजी करत पोलिसांच्या या कृतीचा विरोध दर्शवला. त्यानंतरही पोलीस कारवाई करत राहिले.

त्यानंतर नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महाला म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात होतो आणि निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवले होते. त्यांनी सांगितले होते की, पक्षातील कोणतेही ३० जण निवडणूक आयोगाकडे येऊ शकतात, परंतु २०० हून अधिक नेते येथे आले होते. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना रोखण्यात आले. काही खासदारांनी बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्नही केला होता.”

LiveUnstoppable: पोलिसांनी मोर्चा अडवला,राहुल, प्रियांका गांधींसह खासदारांना ताब्यात घेतले…; दिल्लीत राजकारण तापणार

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाबाहेर दिल्ली पोलिसांसह निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. विरोधकांचा मोर्चा बॅरिकेडिंग करून थांबवण्यात आला मात्र अनेक खासदार बॅरिकेड्स वर चढून बाहेर पडले. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी बॅरिकेडवरून उडी मारली. तृणमूल काँग्रेसचे खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा बॅरिकेड्सवर चढल्या. नंतर अखिलेश यादव यांनी धरणे आंदोलन करत पोलिसांचा निषेध केला.

राहुल गांधी म्हणाले, ‘परिस्थिती अशी आहे की निवडणूक आयोग काहीही बोलू शकत नाही. पण सत्य देशासमोर आले आहे. ही लढाई राजकीय नाही. ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. ही एक व्यक्ती, एक मताची लढाई आहे. आम्हाला स्वच्छ मतदार यादी हवी आहे. तर, ‘हे लोक घाबरले आहेत. सरकार भित्रे आहे.’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली.

जयराम रमेश म्हणाले की, फक्त ३० नाही तर संपूर्ण विरोधी पक्ष निवडणूक आयोगाकडे जाईल. तर अखिलेश म्हणाले की, आम्हाला पाहिजे तितक्या लोकांकडे जाण्यास आम्ही तयार आहोत. जर पोलिसांनी आम्हाला जाऊ दिले तर आम्ही निवडणूक आयोगाकडे जाण्यास तयार आहोत. पोलीस आम्हाला जाऊ देत नाहीत. पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतले आहे. सर्वांना बसमध्ये नेण्यात आल्याचेही अखिलेश यादव यांनी सांगितले.

Unique Maruti Temples in Pune : पुण्यातील विचित्र नावाने ओळखली जाणारी मारुती मंदिरं आणि त्यांचा रंजक

दरम्यान, निवडणूक आयोगाने विरोधी पक्षाच्या ३० सदस्यांच्या शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आयोगाने निवडणूक आयोगाने दुपारी १२ वाजता ३० लोकांना भेटण्यासाठी बोलावले. भारतीय निवडणूक आयोगाच्या सचिवालयाने काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र लिहून दुपारी १२:०० वाजता चर्चेसाठी वेळ दिला. जागेअभावी, जास्तीत जास्त ३० जणांची नावे कळवावीत अशी विनंती आहे. पण एकतर सर्वजण निवडणूक आयोगाकडे जातील किंवा कोणीही जाणार नाही. आम्ही शिष्टमंडळाला भेटण्यासाठी नव्हे तर एकत्रितपणे निवेदन सादर करण्यासाठी वेळ मागितला होता.

मतदार यादीतील अनियमिततेवरून लढाई सुरूच आहे. राहुलसह सर्व विरोधी नेते निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. राहुल यांनी निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप केला आहे. त्यांनी काल यासंदर्भात एक मोहीम देखील सुरू केली आहे. याअंतर्गत राहुल यांनी एक वेबसाइट देखील सुरू केली आहे. यासोबतच त्यांनी लोकांना या मोहिमेत सामील होण्याचे आवाहनही केले आहे.

 

Web Title: Message from the election commission 30 people invited for discussion who will go

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • election commission of india
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन
1

‘ओबीसी विचार महाराष्ट्राचा, तो देशभर पोहोचवण्याची गरज’; हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.