
Mohan Bhagwat in West Bengal speech on RSS thoughts and future direction
Mohan Bhagwat in West Bengal : कोलकाता : आरएसएसच्या १०० व्या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचे विचार आणि वाटचाल पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. कोलकाता येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्याख्यानमालेमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या उद्देश आणि ध्येयाबद्दल भाष्य केले. त्यांनी सांगितले की संघाला विशिष्ट दृष्टिकोनातून किंवा तुलनेने समजून घेणे दिशाभूल करणारे असू शकते. तसेच संघ ही एक सामान्य सेवा संघटना आहे आणि संघाला भाजपच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे स्पष्ट मत भागवत यांनी व्यक्त केले.
मोहन भागवत यांनी संघाच्या स्थापनेच्या मूलभूत उद्देशावर भर दिला. ते म्हणाले, “संघाच्या स्थापनेचे उत्तर एकच वाक्य आहे: ‘भारत माता की जय’. येथे, भारत हे केवळ एक देश नाही, तर एका अद्वितीय नीतिमत्ता आणि परंपरेचे नाव आहे. आमचे ध्येय त्या परंपरेचे समर्थन करणे आणि भारताला पुन्हा जागतिक नेता बनवण्यासाठी समाजाला तयार करणे आहे.” त्यांनी असेही सांगितले की संघ कोणत्याही राजकीय उद्देशातून, स्पर्धातून किंवा विरोधातून जन्माला आला नाही. “संघ हिंदू समाजाच्या संघटनेसाठी, प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी समर्पित आहे,” असे स्पष्ट मत मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
हे देखील वाचा : निवडणुकीमध्ये पैशांची गारपीट…! तेच मशीन सेटिंग अन् तोच आकडा; संजय राऊतांचा चढला पारा
इतिहासाचा दिला संदर्भ
मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात ऐतिहासिक उदाहरणे दिली, सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्युनंतर ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष संपला, परंतु राजा राम मोहन रॉय यांच्या काळापासून सुरू असलेली सामाजिक सुधारणांची प्रक्रिया सतत लाट राहिली. त्यांनी त्याचे वर्णन समुद्रातील एक बेट असे केले, जे पुढे जात राहिले. मोहन भागवत यांनी असेही म्हटले की आता आपल्याला आपला समाज मजबूत करण्याची आवश्यकता आहे. भारताला महान वारसा असून आपण जगाचे नेतृत्व करण्यास तयार असले पाहिजे. “भूतकाळात, आपण ब्रिटिशांविरुद्ध युद्ध हरलो, परंतु आता आपल्याला आपला समाज मजबूत करावा लागेल,” असे मत मोहन भागवत यांनी मांडले आहे.
भागवत यांच्या भाषणात संघाचे महत्त्व, भारताची शक्ती आणि जागतिक भूमिकेवरही भर देण्यात आला, संघाचे उद्दिष्ट केवळ राजकीय नाही तर समाजाची समृद्धी आणि सांस्कृतिक भावना पुन्हा जागृत करणे हे देखील आहे.
हे देखील वाचा : चिपळूण भाजप उमेदवाराच्या विजयाची सर्वत्र चर्चा; केवळ एका मताने मारली बाजी
भागवत यांचा पश्चिम बंगाल दौरा
मोहन भागवत हे सध्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. १८ डिसेंबर पासून त्यांचा हा पश्चिम बंगालचा चार दिवसीय दौरा सुरू आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते ही भेट महत्त्वाची आहे, कारण ही भेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगदी आधी येत आहे. या भेटीदरम्यान, भागवत यांनी राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रसार आणि त्याच्या विचारसरणीबाबत महत्त्वाच्या बाबी सांगितल्या जात आहेत