Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद…; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश

गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला

  • By संदीप गावडे
Updated On: May 27, 2025 | 08:00 PM
'पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद...; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश

'पर्यटन संघर्षमुक्त असावं अन् दहशतवाद...; पहलगाममध्येच बैठक घेत ओमर अब्दुल्लांनी दिला महत्त्वाचा संदेश

Follow Us
Close
Follow Us:

गेल्या महिन्यात दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांचा बळी घेतलेल्या पाहलगाममध्ये मंगळवारी जम्मू-काश्मीरच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला. “पर्यटन हे संघर्षमुक्त असावे आणि त्याला येथील परिस्थितीपासून वेगळे ठेवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

PM Modi Gujarat Visit: त्यावेळी सरदार पटेल यांचे ऐकले असते तर…; नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे

जम्मू आणि काश्मीरमध्ये दुहेरी सत्ताकेंद्रे असण्याच्या आव्हानांचा उल्लेख करताना – त्यांचे सरकार आणि उपराज्यपाल – ओमर म्हणाले की “तीन सरकारे” (या दोन संस्था आणि केंद्र) यांनी एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. “पर्यटन ही माझी जबाबदारी आहे, परंतु पर्यटकांची सुरक्षा ही माझी जबाबदारी नाही,” ते म्हणाले. “येथे, तीन सरकारांना एकत्र काम करावे लागेल: जम्मू आणि काश्मीरचे निवडून आलेले सरकार, जम्मू आणि काश्मीरचे निवडून न आलेले सरकार आणि केंद्र.”

“पर्यटन ही केवळ आर्थिक क्रिया आहे, ही जगाने तशीच पाहिली पाहिजे. ती येथील अस्थिरतेशी जोडली जाऊ नये. माझे सरकार पर्यटनाला येथील परिस्थितीपासून वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “गेल्या पाच-सहा आठवड्यांमध्ये देशभरात अनेक कठीण प्रसंग घडले, पण त्याचा सर्वाधिक परिणाम जम्मू-काश्मीरवर झाला आहे. आम्ही सावधपणे, पण निश्चितपणे पर्यटन पुन्हा सुरू करण्याचे पावले उचलत आहोत आणि मला खात्री आहे की केंद्र सरकारदेखील आवश्यक त्या बाबतीत आमची साथ देईल.”

पंतप्रधानांशी चर्चा, ठोस पावलं अपेक्षित

“पंतप्रधानांनीही या विषयावर काही महत्त्वाचे पावले उचलली आहेत. काही दिवसांपूर्वी एक बैठक झाली, ज्यात वरिष्ठ अधिकारी आणि पर्यटन मंत्री सहभागी होते. नुकत्याच झालेल्या नीति आयोगाच्या बैठकीत मी पंतप्रधानांशी चर्चा केली. काही गोष्टी इथे उघड करता येणार नाहीत, पण काही ठोस निर्णय लवकरच घेतले जातील.आज पाहलगाममध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ही केवळ प्रशासकीय बैठक नव्हती, तर एक ठाम संदेश होता – आम्ही दहशतवाद्यांच्या कायर हल्ल्यांना घाबरत नाही. शांततेचे शत्रू आमचा निर्धार डगमगवू शकत नाहीत. जम्मू-काश्मीर ठाम आहे, मजबूत आहे आणि निर्भय आहे,” असे त्यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर)वर पोस्ट केले.

Operation Sindoor logo : अवघ्या ४५ मिनिटांत बनवला ऑपरेशन सिंदूरचा लोगो, ‘या’ दोन अधिकाऱ्यांची नावे समोर

पर्यटक स्थळे सुरू करण्याचा आग्रह

ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, पाहलगाम येथील हल्ल्यानंतर सुरक्षा पाहणीसाठी ४८ पर्यटन स्थळे बंद करण्यात आली होती – यात श्रीनगरमधील बडामवारी आणि ट्यूलिप गार्डनचाही समावेश होता. “जर ट्यूलिप गार्डन बंद करणे आवश्यक असेल, तर मग पूर्ण काश्मीर बंद करावे लागेल. बैसरान बंद ठेवू शकतो, पण बेटाब व्हॅली आणि अरू व्हॅली हे पर्यटन स्थळे पुन्हा सुरू केली पाहिजेत. पर्यटक स्वतःहून येथे आले आहेत आणि ते सांगत आहेत की, त्यांना इतक्याच छोट्या जागेत मर्यादित ठेवू नका.पर्यटनाच्या पुनरुज्जीवनासाठी धाडस दाखवावे लागेल. “थजीवास ग्लेशियर (सोनमर्ग) यासारखी ठिकाणे पुन्हा उघडण्याबाबतही चर्चा सुरू आहे. आपल्याला काळजीपूर्वक, पण धाडसाने पुढे जावे लागेल,” असे त्यांनी सांगितले.

Web Title: Omar abdullah cabinet meeting in pahalgam for tourists safe 3 govt work together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 08:00 PM

Topics:  

  • indian tourism
  • pahalgam
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

अनेक वादानंतर अखेर ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर; वापरली ‘सरदारजी 3’ ची स्ट्रेटेजी
1

अनेक वादानंतर अखेर ‘Abir Gulaal’ची रिलीज डेट जाहीर; वापरली ‘सरदारजी 3’ ची स्ट्रेटेजी

Pahalgam Attack बाबत नवा खुलासा! पाकिस्तानी दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि लष्कराच्या इशाऱ्यावर हल्ला…; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल
2

Pahalgam Attack बाबत नवा खुलासा! पाकिस्तानी दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि लष्कराच्या इशाऱ्यावर हल्ला…; संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

“चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील १० पैकी… “; ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार
3

“चिदंबरम अँड कंपनीच्या काळातील १० पैकी… “; ‘ऑपरेशन सिंदूर’ वरून अमित शहांचा संसदेत रुद्रावतार

“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ
4

“मग तुम्ही का…?” ऑपरेशन सिंदूरवरून राहुल गांधी-राजनाथ सिंह आमने-सामने; संसदेत गदारोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.