Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PM Modi Speech : PM मोदींचा संसदेत ‘ट्रिपल अटॅक’: केजरीवाल, राहुल गांधी, राजीव गांधींचा उल्लेख करत म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.

  • By संदीप गावडे
Updated On: Feb 04, 2025 | 11:31 PM
PM मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक': केजरीवाल, राहुल गांधी, राजीव गांधींचा उल्लेख करत म्हणाले...

PM मोदींचा संसदेत 'ट्रिपल अटॅक': केजरीवाल, राहुल गांधी, राजीव गांधींचा उल्लेख करत म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावला उत्तर दिलं. या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

पंतप्रधान मोदींनी सांगितलं गेल्या पाच दशकात आपण फक्त ‘गरिबी हटाव’ च्या घोषणा ऐकल्या आहेत. पण, आम्ही गरिबांसाठी घोषणा दिल्या नाहीत. त्यांचा खरा विकास केला. आमच्या सरकारनं 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे. जमिनीशी जोडलेली माणसं जमिनीवरील सत्यता ओळखून आपलं आयुष्य जमिनीवर घालवतात, तेव्हा जमिनीवर बदल निश्चित घडतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, आम्ही गरिबांना खोटी आश्वासनं दिली नााहीत. आम्ही खरा विकास केला आहे. गरिबांचं दु:ख , सामान्य माणसांचा त्रास, मध्यवर्गीयांची स्वप्न असंच कळत नाहीत. त्यासाठी ध्यास लागतो आणि मला दु:खानं सांगावं लागतंय की काही लोकांमध्ये तो नाही. पावसाळ्याच्या दिवसात गळकं छत, त्यावर प्लास्टिकच्या चादरीचे छत, त्याखाळी जगणं किती अवघड आहे. प्रत्येक क्षणाला स्वप्न चिरडली जातात, हे प्रत्येक जण समजू शकत नाही.

भाषणातील महत्त्वाची मु्द्दे
आम्ही 12 कोटींपेक्षा जास्त शौचालयं तयार करुन आई आणि बहिणींचा त्रास कमी केला.काही जणांचा फोकस घरातील जकूजीवर, स्टायलिश शॉवरवर आहे. पण, आमचा फोकस प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याावर आहे.आमच्या सरकारनं पाच वर्षात 12 कोटी कुटुंबीयांना नळ कनेक्शन दिले.आपल्या देशाचे एक पंतप्रधान होते. त्यांना मिस्टर क्लीन म्हणण्याची सवय झाली होती. त्यांनी एक अडचण ओळखली होती. त्यांनी सांगितलं होतं की, ‘दिल्लीमधून एक रुपया निघतो त्यामधील 15 पैसे गावापर्यंत पोहोचतात. त्यावेळी पंचायत ते पार्लमेंटपर्यंत एकाच पक्षाचं राज्य होतं. पण, अद्भूत हाथ सफाई होती. 15 पैसे कुणाकडं जात होते ते तुम्ही सहज ओळखू शकता. देशानं आम्हाला संधी दिली. आम्ही उत्तर शोधण्याचं काम केलं. आमचं मॉडेल बचत आणि विकास आहे. जनतेचा पैसा जनतेसाठी आहे. ताप वाढल्यावर लोकं काहीही बोलतात. पण, जेव्हा जास्त निराशा-हताशा असते त्यावेळी देखील खूप सारं बोलतात.

ज्यांचा जन्मच झााला नव्हता. जे भारताच्या जमिनीवर कधी अवतरलेच नाहीत, असे 10 कोटी बनावट लोकं सरकारी तिजोरीतून वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत होते. आम्ही 10 कोटी बनावट नावं हटवली. त्यामधून जवळपास 3 लाख कोटी रुपया चुकीच्या हातामध्ये जाण्यापासून वाचला.काही जण मोठी-मोठी आश्वासनं देतात. पण, त्यानंतर ती पूर्ण करत नाहीत. हे पक्ष तरुणांना सतत धोका देतात. आपदा बनून आदळली आहेत. आम्ही तरुणांच्या भविष्याचा विचार करुन काम करत आहोत.आम्ही राज्यघटनेनुसार वागतो. द्वेषाचं राजकारण करत नाही.आजकाल काही लोकं शहरी नक्षलवाद्यांची भाषा उघडपणे बोलतात. शहरी नक्षलवाद्यांची भाषा बोलणाऱ्यांना देशाची राज्यघटना किंवा देशाची एकता समजू शकत नाही.

Web Title: Pm narendra modi attack on rajiv gandhi rahul gandhi arvind kejriwal in budget session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 11:31 PM

Topics:  

  • Budget Session
  • PM Narendra Modi
  • Rajiv Gandhi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
4

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.