
AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत... ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर
योट्टा डाटा सर्व्हिसनेने एनवीडियाच्या नवीनतम चिप्सच्या विकासासाठी २ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ते एक एआय संगणकीय केंद्र तयार करेल, जे देशाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एआय उपक्रमांना लक्षणीयरीत्या चालना देईल. योट्टा त्याच्या विस्तारासान गुंतवणूकदारांकडून अंदाजे ४१.२ अब्ज उभारण्याची योजना आखत आहे.
एनवीडिया भारतात एक मेगा AI कारखाना स्थापन करण्याची योजना आखत आहे, ज्यासाठी ती भारतीय कंपनी लार्सन अॅड टुब्रो (एल अँड टी) सोबत भागीदारी करेल. या भागीदारीत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक असेल. भारतीय स्टार्टअप नेयसा एआयने १.२ अब्ज डॉलर किंवा अंदाजे १०,००० कोटी रुपयांचा महत्वपूर्ण निधी उभारून लक्ष वेधले. जागतिक दिग्गज ब्लॅकस्टोनने देखील नेयसामध्ये गुंतवणूक केली आहे. नेयसा ही मूळतः एक एआय पायाभूत सुविधा कंपनी आहे. ती कोणताही चॅटवॉट किंवा संगणक अॅप तयार करत नाही, परंतु थेट तांत्रिक रचना तयार करते.
In my address at the Leaders’ Plenary at the AI Impact Summit, emphasised the need to build a global AI ecosystem that is human-centric and sensitive. After all, humanity has always turned disruptions into opportunities and the rise of AI presents yet another such key… pic.twitter.com/xkxhKtaveq — Narendra Modi (@narendramodi) February 19, 2026
गुगलची गुंतवणूक देशातील पहिले प्रमुख एआय हब निर्माण करेल. या प्रकल्पाचा सर्वांत मोठा घटक म्हणजे आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे बांधण्यात येणारा एक मेगा एआय डेटा सेंटर. त्यात एआय मॉडेल प्रशिक्षण, क्लाउड सेवा आणि संगणकीय सुविधा असतील.
मायक्रोसॉफ्टने ग्लोबल साउथमध्ये ५० अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली आहे. ही गुंतवणूक पुढील चार वर्षांत केली जाईल. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने भारतात १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, त्यांची कंपनी, जिओ, रिलायन्ससह, सात वर्षांत एआय क्षेत्रात १० लाख कोटी रुपये गुंतवणूक करेल. एआयचे सर्वोत्तम रूप अजून येणे बाकी आहे आणि ते मोठ्या समृद्धीच्या युगाची सुरुवात करू शकते. त्यांनी असेही आश्वासन दिले की, मोबाइल डेटाप्रमाणेच, कृत्रिम बुद्धिमत्ता क्रांती घडवेल. एआयच्या बाबतीत जग एका चौरस्त्यावर उभे आहे. एक मार्ग जटिल, महागड्या एआय आणि नियंत्रित डेटाकडे जातो, तर दुसरा मार्ग परवडणारा आणि सुलभ एआय सुनिश्चित करतो.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मैक्रोंन यानी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारताच्या डिजिटल प्रगतीचे कौतुक केले. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ ने केली आणि सांगितले की भारताने एक अद्वितीय डिजिटल ओळख आणि पेमेंट सिस्टम तयार केली आहे. त्यांच्या शिखर परिषदेच्या भाषणादरम्यान त्यांनी मुंबईतील एका रस्त्यावरील विक्रेत्याची कहाणी सांगितली. भारतातील डिजिटल पेमेंट सिस्टीमच्या जलद विस्तारामुळे त्यांचे जीवन कसे बदलले याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले की, १० वर्षांपूर्वी, मुंबईतील एका रस्त्यावरील विक्रेत्याला बँक खाते उघडता येत नव्हते. पत्ता नव्हता, कागदपत्रे नव्हती, प्रवेश नव्हता. आज तो त्याच्या फोनवर पेमेंट स्वीकारतो. ही तंत्रज्ञानाची कथा नाही, ती संस्कृतीची कथा आहे.
नवी दिल्ली फ्रंटियर एआय कमिटमेंट्स’चे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा उपक्रम इंडिया एआय इम्पॅक्ट परिषदेतील प्रमुख फलनिष्पत्ती मानला जात आहे. या आराखड्यात आघाडीच्या जागतिक आणि भारतीय कृत्रिम बुद्धिमत्ता कंपन्यांनी स्वीकारलेल्या ऐच्छिक वचनबद्धतेचा संच समाविष्ट आहे. समावेशक आणि जबाबदार एआय विकासासाठी एकत्र येत सामायिक बांधिलकी स्वीकारल्याचे मंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितले. परिषदेत सादर करण्यात आलेल्या सार्वभौम एआय मॉडेल्स विषयी माहिती देताना त्यांनी नमूद केले की, ही मॉडेल्स बहुउद्देशीया आणि बहुभाषिक आहेत, त्यामुळे त्यांची व्याप्ती अधिक व्यापक आहे.