
येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Naremdra Modi) सातत्याने राज्यांचे दौरे करत आहेत. गेले दोन दिवस ते ईशान्ये कडील राज्याच्या दौऱ्यावर होते. शनिवारी पश्चिम बंगालला मधील सिलीगुडीलाही त्यांनी भेट दिली.त्यानंतर ते आता बनारसला पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी आपल्या लोकसभा मतदारसंघात काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन पूजा केली. येथे त्यांनी बाबा विश्वनाथ यांना अभिषेक केला. पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते.
[read_also content=”पाकिस्तानच्या पेशावरमध्ये आत्मघातकी हल्ला, दोन जणांचा मृत्यू, एक जण जखमी! https://www.navarashtra.com/world/two-killed-and-one-injured-in-suicide-blast-in-peshawar-pakistan-nrps-514230.html”]
पंतप्रधान मोदी बनारसमध्ये पोहोचले आणि ठिकठिकाणी लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. बाबतपूर विमानतळ ते काशी विश्वनाथ मंदिरापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांनी पीएम मोदींच्या स्वागताच्या घोषणा दिल्या. उत्साही लोक मोदी-मोदी आणि हर हर महादेवच्या घोषणा देत होते. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी, बंगालमधील सिलीगुडी येथे विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीनंतर रॅलीला संबोधित करताना, पंतप्रधान मोदींनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मनरेगाच्या बनावट जॉब कार्डद्वारे केंद्र सरकारकडून मिळालेला पैसा ममता सरकारने लुटल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींनी टीएमसी सरकारवर घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले की, भारतातील टीएमसी आणि काँग्रेस या पक्षांना फक्त त्यांच्या कुटुंबाच्या विकासाची काळजी आहे.