Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जर तिकडून गोळी चालवली तर इकडून गोळा…; युद्धाच्या तणावपूर्ण वातावरणात पंतप्रधान मोदींचे आक्रमक विधान

India Pakistan war : भारत आणि पाकिस्तानमध्ये आता युद्धबंदी लागू झालेली असली तर भारत सावधगिरी बाळगून आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 12, 2025 | 11:40 AM
Prime Minister Narendra Modi's aggressive stance on the India-Pakistan war

Prime Minister Narendra Modi's aggressive stance on the India-Pakistan war

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करुन पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. यामध्ये 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशातून रोष व्यक्त करण्यात येत होता. तसेच बदला घेण्याची मागणी केली जात होती. यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर करुन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तानने देखील भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानने भारताच्या सीमा भागातील राज्यांवर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारतीय दलांनी दिलेल्या माहितीमध्ये 400 हून अधिक ड्रोनचे हल्ले पाकिस्तानने केल्याचे सांगण्यात आले. भारताने हे सर्व हल्ले परतवून लावत पाकिस्तानमध्ये घुसून त्यांच्यावर हल्ला केला. यामुळे पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. तीन दिवस ही युद्धपरिस्थिती झाल्यानंतर अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम लागला. दरम्यान, भारत पाकिस्तान युद्धामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्रमक पवित्रा दिसून आला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भारतामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. युद्धविराम लागल्यानंतर देखील पाकिस्तानकडून तीन तासांमध्ये याचे उल्लंघन करण्यात आले. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यामध्ये चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ९ मे रोजी फोनवरून संवाद साधत दोन्ही देशातील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्याची माहिती सांगितली जाते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या संवादावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी व्हान्स यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत ठणकावून भूमिका घेतली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, “पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आल्यास भारत देखील जोरदार प्रत्युत्तर देईल पाकिस्तानच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला भारताचं प्रत्युत्तर अधिक कठोर असेल, असं पंतप्रधान मोदीनी जेडी व्हान्स यांना सांगितले.

भारत पाकिस्तान युद्धांच्या अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा

भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविरामाच्या घोषणनेनंतर रविवारी समोर आलेल्या तपशीलानुसार, ७ मे रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ऑपरेशन सिंदूर ची कारवाई केल्यानंतर सरकारकडून लष्कराला काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान, पाकिस्तानने आगळीक केली तर जशास तसं प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मोदींनी लष्कराला दिल्या होत्या. यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, ‘जर तिकडून गोळ्या चालवल्या तर इकडून गोळे चालतील, असा इशारा मोदींनी दिला होता.

दिल्लीमध्ये हालचालींना वेग

तणावपूर्ण परिस्थिती निवळल्यानंतर आता दिल्लीमध्ये बैठकीचा वेग वाढला आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली जात आहे. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तिन्ही दलाचे प्रमुख मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Web Title: Prime minister narendra modis aggressive stance on the india pakistan war

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • India Pakistan Ceasefire
  • india pakistan war
  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट
1

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा
2

India vs Pakistan: “आम्ही त्यांना जगाच्या नकाशावरून पुसून टाकू…’, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा
3

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली
4

पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला! ‘या’ दहशतवाद्याने सरकार आणि सैन्याशी संबंधावर थेट दिली कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.