Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rahul Gandhi News: निवडणूक आयोगापासून कायद्यातील बदलांपर्यंत; 3 प्रश्नातून राहुल गांधींचा केंद्रावर आसूड

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधिशांनाच का वगळण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०२३ मध्ये केंद्राने कायद्यात बदल का केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 10, 2025 | 04:12 PM
Rahul Gandhi Speech,

Rahul Gandhi Speech,

Follow Us
Close
Follow Us:
  • राहुल गांधींचे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह
  • संस्थात्मक चौकटीवर ताब्याचा आरोप
  • केंद्र सरकारविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका
Rahul Gandhi: गेल्या काही महिन्यापासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकारच्या निर्णयांवर टिका करत आहेत. जीएसटीपासून निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या एसआयआर प्रक्रियेपर्यंत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांवर निशाणा साधला आहे. अशातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही राहुल गांधींचा आक्रमक बाणा दिसून येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांनी पुन्हा केंद्र सरकारला तीन प्रश्न विचारत मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीतून सरन्यायाधिशांनाच का वगळण्यात आले असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर २०२३ मध्ये केंद्राने कायद्यात बदल का केला. ज्यामुळे निवडणूक आयुक्तांना त्यांच्या कोणत्याही कृतीसाठी शिक्षा केली जाऊ शकत नाही.यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी भेट दिली नव्हती. निवडणुका झाल्यानंतर ४५ दिवसांतच सीसीटिव्ही फुटेज नष्ट करण्याची परवानगी देणारा कायद्यात बदल का करण्यात आला, असे सवाल उपस्थित करत राहुल गांधींनी मोदी (Narendra Modi)  सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नकेला आहे. तसेच हा डेटाचा प्रश्न नसून निवडणुका चोरण्याचा प्रश्न असल्याचा हल्लाबोलही राहुल गांधींनी केला आहे.

Crime News: कोकणातील ‘या’ नदीतून अवैध वाळू उपसा; पोलिसांनी तिघांना थेट…

महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यंच्या समान भारताच्या कल्पनेचा नाश करण्याचा प्रकल्प सुरू झाला, या प्रकल्पाचा पुढचा टप्पा म्हणजे भारतातील संस्थात्मक चौकटीवर ताबा मिळवणे. आता भारतीय विद्यापिठांच्या कुलगुरुंची नियुक्ती ही योग्यता, क्षमता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित राहिली नाही. तर ते विशिष्ट संघटनेचे सदस्य आहेत. या आधावर केली जाते. सीबीआय (CBI), ईडी (ED) आणि आयकर विभाग (Income Tax Department) यांसारख्या महत्त्वाच्या तपास संस्थांवर नियंत्रण मिळवणे, तसेच आपल्या विचारसरणीचे समर्थन करणारे आणि विरोधकांविरोधात कार्यवाही करणारे नोकरशहा नियुक्त करणे—ही संस्थात्मक ताब्याची दुसरी पायरी मानली जात आहे. देशातील निवडणूक प्रक्रियेवर थेट देखरेख ठेवणारी संस्था देखील आता त्यांच्या प्रभावाखाली गेली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, एक काळ असा होता जेव्हा निवडणूक आयोग संस्थात्मकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वायत्त होता; मात्र आज तो आरएसएस आणि भाजपच्या नियंत्रणाखाली कार्य करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

Pune Sahyadri Hospital Vandelised: रुग्णाच्या मृत्यूवरून संताप, हडपसरमध्ये सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड

निवडणूक आयोग आता स्वतंत्र पंच म्हणून काम न करता सत्ताधारी पक्षाशी “समन्वयाने” निर्णय घेतो. सरकारी सूचनांनुसार निवडणूक वेळापत्रक आखले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आणि सरकारी विमानाचा वापर सुलभ करण्यासाठी देशातील निवडणुका महिनोंभर पुढे ढकलल्या जातात, असे ते म्हणाले. “हे समान खेळाचे मैदान नाही,” असा आरोप करत राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीत इतका रस का आहे? त्यांना स्वतःच पंच कोण असेल हे ठरवायचे आहे, जेणेकरून सामन्याचा निकाल आधीच निश्चित करता येईल.”

 

Web Title: Rahul gandhi targets centre sharp questions on election commission institutional autonomy legal amendments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 04:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.