Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Election : बिहारच्या राजकारणात नवं समीकरण; प्रशांत किशोर, आरसीपी सिंह NDA, INDIA आघाडीचं टेन्शन वाढवणार

माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या ‘आप सबकी आवाज़’ पक्ष प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीत विलिन केला आहे. त्यामुळे NDA आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 18, 2025 | 07:52 PM
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण; प्रशांत किशोर, आरसीपी सिंह NDA, INDIA आघाचीचं टेन्शन वाढवणार

बिहारच्या राजकारणात नवं समीकरण; प्रशांत किशोर, आरसीपी सिंह NDA, INDIA आघाचीचं टेन्शन वाढवणार

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसं राजकीय वातावरण तापू लागलं आहे. नव्या राजकीय समीकरणांचा उदय होत आहेत. माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या ‘आप सबकी आवाज़’ पक्ष प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीत विलिन केला आहे. यामुळे आगामी विधानसभा विडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालचे सहाय्यक प्रणाली व्यवस्थापक निलंबित; निवडणूक प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी कारवाई

बिहारमध्ये सध्या भाजपा-जद(यू) नेतृत्वाखालील एनडीए आणि राजद-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महागठबंधन यांच्यात थेट लढत होणार होती. मात्र आता, प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील जन सुराज पार्टीही तिसऱ्या पर्यायाच्या रूपात संपूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहे. जन सुराजने 243 पैकी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. प्रशांत किशोर यांनी राज्यभर जिल्हानिहाय दौरे केले आहेत आणि विविध समाजघटकांपर्यंत पोहोचत. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे.

एक अनुभवी चेहरा जन सुराजमध्ये

आरसीपी सिंह यांचा बिहारच्या राजकारणात मोठा दबदबा आहे. मूळचे कुर्मी समाजातील आणि एकेकाळचे IAS अधिकारी असलेले सिंह हे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. त्यांनी नीतीश कुमार यांच्या रेल्वेमंत्री काळात प्रशासकीय सेवा दिली होती. नंतर ते 2010 मध्ये सिव्हिल सेवा सोडून जद(यू) मध्ये सामील झाले. त्यांनी दोनदा राज्यसभेत जाऊन केंद्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम केले. मात्र, 2021 नंतर नीतीश कुमार यांच्याशी मतभेद निर्माण झाले आणि त्यांनी नवीन पक्ष ‘आप सबकी आवाज़’ स्थापन केला होता. मात्र आता हा पक्ष जन सुराजमध्ये विलिन करून प्रशांत किशोर यांच्यासोबत नवीन राजकीय प्रयोगाची सुरुवात केली आहे.

बिहारच्या सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान

राजकीय रणनीतीकार म्हणून राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या किशोर यांनी बिहारमध्ये राजकारणात प्रत्यक्ष प्रवेश केला असून, राज्यातील भ्रष्टाचार, विकासाचा अभाव, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात लालू यादव आणि नीतीश कुमार यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, “जर या नेत्यांनी खरोखरच विकासावर लक्ष केंद्रित केलं असतं, तर बिहारची आज अशी दुर्दशा नसती.”

जन सुराज, AIMIM आणि इतर लहान पक्षांची एकजूट ही निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची शक्यता दर्शवते. आरसीपी सिंह यांच्या अनुभवाचा फायदा किशोर यांना होण्याची शक्यता आहे, विशेषतः कुर्मी आणि ओबीसी मतदारांमध्ये. मात्र, बिहारसारख्या पारंपरिक मतदारसंघ असलेल्या राज्यात नव्या पक्षांचा प्रभाव किती असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

केंद्र सरकार पाकिस्तानला घेरणार; पहलगाम हल्ल्यानंतर सुप्रिया सुळेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

राज्यात नव्या नेतृत्वाची गरज असल्याचं चित्र प्रशांत किशोर रंगवत आहेत. मात्र, मतदार हे पारंपरिक पक्षांपासून दूर जातील की नाही, हे अजूनही अनिश्चित आहे. आरसीपी सिंह यांची साथ आणि जन सुराजचा व्यापक जनसंपर्क हा एक शक्तिशाली प्रयोग ठरू शकतो. मात्र, अंतिम निकाल काय येतो, हे तर निवडणुकीनंतरच कळेल. सध्या तरी बिहारच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ही नवी जोडी ठरली आहे.

Web Title: Rcp singh merged his aap sabki awaaz party with prashant kishor jansuraj party contest bihar election marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 07:50 PM

Topics:  

  • Assembly Election
  • Bihar Election
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर
1

निवडणूक आयोगावर प्रश्न की भाजपशी लढण्याची रणनीती, बिहार निवडणुकीपूर्वी इंडिया अलायन्सची काय स्थिती? वाचा एका क्लिवर

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?
2

नितीश कुमार यांच्या मुलाचा राजकारणात प्रवेश होणार? ‘निशांत संवाद’द्वारे आज घोषणा करणार?

‘चूक दुसऱ्याची, मी स्पष्टीकरण का देऊ?; अखेर मतदान ओळखपत्रावरून तेजस्वी यादव यांनी सोडलं मौन
3

‘चूक दुसऱ्याची, मी स्पष्टीकरण का देऊ?; अखेर मतदान ओळखपत्रावरून तेजस्वी यादव यांनी सोडलं मौन

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार
4

बिहारमध्ये RJD अडचणीत, तेज प्रताप यांची VVIP सोबत युती, सर्व जागांवर निवडणूक लढवणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.