Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पूर्वी मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडतं’, SIR वरून तेजस्वी यादवांची सरकारवर जहरी टीका

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मतदार यादी फेरपडताळणीवरून पुन्हा सरकारवर टीका केली आहे. लोकशाहीसाठी घातक असलेली ही मोहीम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Aug 08, 2025 | 08:45 PM
'पूर्वी मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडतं', SIR वरून तेजस्वी यादवांची सरकारवर जहरी टीका

'पूर्वी मतदार सरकार निवडायचे, आता सरकार मतदार निवडतं', SIR वरून तेजस्वी यादवांची सरकारवर जहरी टीका

Follow Us
Close
Follow Us:

बिहारमध्ये मतदार यादी विशेष फेरपडताळणीवरून (SIR) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सरकारचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे तर सत्ताधारी पक्षांनी निवडणूक सुधाराच्या दिशेने आवश्यक पाऊल असल्याचं म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.

उज्ज्वला योजना, एलपीजी अन् शिक्षण… मोदी सरकारने तिजोरी उघडली; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ५ मोठे निर्णय

“पूर्वी मतदार सरकार निवडायचे, आता सरकारच मतदार निवडते. या प्रक्रियेद्वारे सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीच्या मतदारांच्या याद्या तयार करत असून, जनतेच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणत आहे. लोकशाहीसाठी हे धोकादायक असून ही प्रक्रिया त्वरित थांबवण्याची मागणी त्यांनी केली आहे.

‘लोकशाही नव्हे, राजेशाही आणण्याची तयारी’

तेजस्वी यादव यांनी निवडणुकीच्या अगोदर इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार पुनर्निरीक्षण मोहीम राबवण्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप केला. “ निवडणूक आयोग आता भाजपाच्या इशाऱ्यावर चालत आहे. निवडणुका आता मुक्त व निष्पक्ष राहिलेल्या नाहीत, तर पूर्णपणे कॉप्रोमाइज’ झाल्या आहेत, ही लोकशाही नाही, राजेशाही आणण्याची तयारी आहे. आम्ही प्रत्येक मंचावर याचा विरोध करू. आज नाही तर उद्या, निवडणूक आयोगाला याचं उत्तर द्यावंच लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

तेजस्वी यादव यांनी पुढे सांगितले, “जर मतदार याद्यांमधून लोकांची नावे काढून टाकली, तर आम्ही जनप्रतिनिधी म्हणून कुणाचे प्रतिनिधित्व करू? जर आपल्या मतदारांचे रक्षणच करू शकलो नाही, तर आमचे अस्तित्व कशासाठी? हा केवळ मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न नाही, तर लोकांच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा कट आहे. मतदार नाही राहिला, तर नागरिकही राहणार नाही. आणि कदाचित पुढे त्यांच्या मालमत्ताही जप्त करण्याची वेळ येईल. अशा मोहिमा लोकशाहीसाठी सरळ सरळ धोका असल्यांच त्यांनी म्हटलं आहे.

संसदेत INDIA आघाडीचा जोरदार विरोध

SIR उपक्रमाविरोधात आता संघर्ष संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी INDIA आघाडीतील अनेक खासदारांनी संसद भवन परिसरात बॅनर-पोस्टर घेऊन घोषणाबाजी करत निदर्शने केली. या वेळी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्यासह विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते. हा उपक्रम मतदारांना घाबरवण्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. मतदार याद्यांमधून नावे हटवण्याची ही पद्धत लोकशाहीला बाधा आणणारी आहे आणि त्वरित रद्द केली करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.

SIR साठी बंगाल तयार नाही, 2 वर्षांनंतर या; ममता बॅनर्जी सरकारचं निवडणूक आयोगाला उत्तर

हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष या मुद्द्यावर संसदेत गदारोळ घालत आहेत. संसदेतून रस्त्यावरपर्यंत विरोध सुरू असून, सरकार आणि निवडणूक आयोगावर सातत्याने दबाव टाकला जात आहे. लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार, आणि त्यावर कुठलाही आघात आम्ही सहन करणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला आहे.

Web Title: Tejashwi yadav slams government bihar sir controversy on voter list revision latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2025 | 08:45 PM

Topics:  

  • Bogus Voting
  • Election Commission
  • Tejashwi Yadav

संबंधित बातम्या

आचारसंहितेचा भंग केल्यास होऊ शकते शिक्षा! निवडणूक आयोगाकडून सक्त अंमलबजावणीच्या सूचना
1

आचारसंहितेचा भंग केल्यास होऊ शकते शिक्षा! निवडणूक आयोगाकडून सक्त अंमलबजावणीच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.