
सर्व्हेनुसार, काँग्रेसला यावेळी तुलनेने फायदा होताना दिसत असून, पक्षाला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) ला १२७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
Tamil Nadu Exit Poll 2026: DMK पुन्हा सत्तेत, तर अभिनेता विजय किंगमेकर? पाहा तमिळनाडू निवडणुकीचे
दुसरीकडे, भाजप १७१ जागांसह आघाडीवर असल्याचे चित्र आहे. लेफ्ट फ्रंटला ३ जागा, तर इतरांना १ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. त्या वेळी TMC ने २१३ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन केली होती, तर भाजप ७१ जागांवर थांबला होता. यंदा मात्र भाजपच्या कामगिरीत सुधारणा दिसून येत आहे.
News18 च्या ‘व्होटव्हाइब’ एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमधील राजकीय चित्रात मोठा बदल दिसून येत आहे. या अंदाजानुसार भाजप दमदार कामगिरी करत असून राज्यात ऐतिहासिक आघाडीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, 294 पैकी भाजप सुमारे 153 जागा जिंकू शकतो, तर चृण (टीएमसी) सुमारे 143 जागांवर मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात 93 आणि दुसऱ्या टप्प्यात 60 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हा अंदाज खरा ठरल्यास पश्चिम बंगालच्या सत्तासमीकरणात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत झालेल्या मतदानात विक्रमी टक्केवारी नोंदवली गेली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, एकूण मतदान ९२.४७ टक्के झाले असून, हे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक मतदान आहे.
दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी ७.४५ वाजेपर्यंत ९१.६६ टक्के मतदान झाले, तर २३ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के मतदानाची नोंद झाली होती. राज्यात एकूण ६.८१ कोटी मतदार आहेत.
या निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग पुरुषांच्या तुलनेत किंचित जास्त राहिला. आयोगाच्या आकडेवारीनुसार, ९२.२८ टक्के महिला मतदारांनी मतदान केले, तर पुरुष मतदारांचे प्रमाण ९१.०७ टक्के होते.