घटना.
१६७४ : शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.
१७९९ : महाराजा रणजित सिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले आणि पंजाबचे सम्राट झाले.
१९२० : पनामा कालव्याचे औपचारिक उद्घाटन झाले.
१९३५ : प्रभातचा चन्द्रसेना हा मराठी चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.
१९६१ : पानशेत, खडकवासला ही धरणे फुटल्यामुळे पुण्यातील पुरात २,००० लोक मृत्यूमुखी, १,००,००० लोक विस्थापित झाले.
१९६२ : लंडनमधील मार्क्वी क्लबमधे द रोलिंग स्टोन्स चा पहिला कार्यक्रम झाला.
१९७९ : किरिबातीला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
१९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना झाली.
१९८५ : पी. एन. भगवती भारताचे १७ वे सरन्यायाधीश झाले.
१९९५ : अभिनेते दिलीपकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
१९९८ : १६ व्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत यजमान फ्रान्सने गतविजेत्या ब्राझिलचा ३-० असा पराभव करुन विश्वकरंडक जिंकला.
१९९९ : महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुनील गावसकर यांना प्रदान.
२००१ : कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना टिळक पुरस्कार प्रदान.