Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युजीसी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ विद्यार्थी भारती संघटनेचे आंदोलन

  • By साधना
Updated On: Jul 16, 2020 | 05:15 PM
युजीसी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ विद्यार्थी भारती संघटनेचे आंदोलन
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण :  केंद्र सरकारने युजीसीच्या गाईड लाईन्सनुसार परीक्षांच्या संदर्भात जो निर्णय घेतला त्यामुळे देशभरात परीक्षा होणार असल्याने अनेक विद्यार्थी चिंतेत आहे. एवढ्या भयंकर महामारीत विद्यार्थी घरात पडलेल्या मृत्यूच्या सड्याशी दोन हात करेल, रिकाम्या पोटाला भरण्यासाठी धडपड करेल की अंतिम सत्राच्या परीक्षा देण्याची तयारी करेल असा सवाल उपस्थित करत युजीसी आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी भारती संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.   

कल्याण नजीक असलेल्या मैत्रकुल येथील शांतीवनात या उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेले कित्येक दिवस विद्यार्थी भारती केंद्र सरकारच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात पत्र, इमेल आणि ट्विटरच्या माध्यमातून लढत आहे. पण याकडे सातत्याने दुर्लक्ष करून विद्यार्थ्याचे जीवन धोक्यात टाकण्याची शपथ घेतल्यासारखे केंद्र सरकार वागत आहे आणि  विद्यार्थ्याना समजून घेण्याचे दूर उलट त्यांच्या जीवाची तुलना दारूच्या दुकानांशी युजीसी उपाध्यक्ष भूषण पटवर्धन करीत आहेत. याचा विद्यार्थी भारती संघटना धिक्कार करते. 

आज परिक्षेमुळे इस्राईल सारख्या देशात जे झाले त्याचे उदाहरण समोर आसताना केंद्र सरकार मुलांना मृत्यूच्या दारात का ढकलत आहे असा सवाल आहे. आज कोरोनामुळे तरुण मुलं मृत्युमुखी पडण्याची उदाहरणं डोळ्यासमोर असताना केंद्राचा हा बालिशपणा अस्वस्थ करणारा आहे. या परीक्षांच्या निर्णयात स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणाऱ्या राज्य सरकारच कौतुक आहे. मात्र केंद्राच्या या मनमानी कारभाराचा त्वरित विरोध करणे गरजेचे आहे म्हणून आजपासून आमरण उपोषणाला सुरवात केली असल्याची प्रतिक्रिया मंजिरी धुरी यांनी दिली. तर सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास केले पाहिजे, एटीकेटी / बॅकलॉग च्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय त्वरित घेण्यात यावा, विद्यार्थ्यांना त्यांची स्कॉलरशिप देण्यात यावी, कोरोनाच्या काळात कोणत्याही विद्यार्था कडून फी देण्यात येऊ नये. कोणत्याही प्रकारचे लेक्चर व सबमिशनची सक्ती या काळात नसावी. आदी प्रमुख मागण्या त्यांनी या उपोषणाद्वारे सरकारकडे केल्या आहेत.

Web Title: Vidyarthi bharti protest against ugc and central government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2020 | 05:14 PM

Topics:  

  • hunger strike

संबंधित बातम्या

Kalyan : गोविंदवाडीतील अस्वच्छतेविरोधात शिफा पावले यांचे आमरण उपोषण सुरू
1

Kalyan : गोविंदवाडीतील अस्वच्छतेविरोधात शिफा पावले यांचे आमरण उपोषण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.