Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, अ‍ॅसिडिटीची समस्या होईल कमी

शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात बदल करून थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत. जाणून घ्या उन्हाळ्यात कोणते पदार्थ नियमित खावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2025 | 08:42 AM
उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

उन्हाळ्यात शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. सतत अ‍ॅसिडिटी होणे, पित्ताचे आंबट ढेकर येणे, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा आरोग्यावर बऱ्याचदा गंभीर परिणाम दिसून येतो.(फोटो सौजन्य – iStock)

अन्नपदार्थ खाल्यानंतर सहज पचन होत नाही? पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, शरीरातील आतड्या होतील स्वच्छ

शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे अ‍ॅसिडिटी, जळजळ, थकवा, तहान वाढणे, डोकेदुखी किंवा सतत चिडचिड होणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात थंडगार आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे तळपायांमध्ये सतत जळजळ होऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात.

ताक पिण्याचे फायदे:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्मांमुळे शरीर थंड राहते. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी नियमित एक ग्लास ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहून उष्णता कमी होते. उष्णता वाढल्यानंतर पोटात सतत जळजळ, आग होऊ लागते. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हिंग आणि जिऱ्याची पावडर टाकून बनवलेल्या ताकाचे सेवन करावे.

गुलकंद:

गुलकंद हा पदार्थ अतिशय थंड आहे. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी नियमित एक चमचा गुलकंद खावा. रात्री झोपताना किंवा दिवसभरात कोणत्याही वेळी एक ग्लास दुधात गुलकंद मिक्स करून प्यायल्यास पोटात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्य सुधारेल. पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी सकाळी आणि रात्री झोपण्याआधी गुलकंद खावे. या पदार्थाच्या सेवनामुळे रात्री शांत झोप लागते.

कोरफड रस:

थंड गुणधर्मांनी समृद्ध असलेले कोरफड जेल आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. यामध्ये असलेले गुणधर्म शरीर कायम हायड्रेट ठेवतात. पोटात वाढलेली जळजळ, आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित कोरफडचा रस प्यावा. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोरफडचा रस प्यायल्यास शरीर शांत राहते आणि पचनाची समस्या उद्भवत नाही.

उन्हाळ्यात ताक की दही… शरीराला थंड ठेवण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय कोणता? आजच जाणून घ्या

नारळ पाणी:

थकवा, अशक्तपणा वाढल्यानंतर आवर्जून प्यायले जाणारे पेय म्हणजे नारळ पाणी. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. डिहायड्रेशनची समस्या कमी करण्यासाठी नारळ पाण्याचे नियमित सेवन करावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे पचनसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these foods in your diet to reduce the increased heat in the body in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2025 | 08:42 AM

Topics:  

  • acidity
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

गॅसमुळे सतत पोटात जडपणा जाणवतो? मग ‘हे’ उपाय करून कायमचा मिळवा आराम, पोट राहील स्वच्छ
1

गॅसमुळे सतत पोटात जडपणा जाणवतो? मग ‘हे’ उपाय करून कायमचा मिळवा आराम, पोट राहील स्वच्छ

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी
2

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ
3

आतड्या आणि पोटांच्या समस्यांपासून मिळेल कायमची सुटका! ‘हे’ आयुर्वेदिक आंबवलेले पदार्थ शरीर करतील स्वच्छ

जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? ‘या’ सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम
4

जेवणानंतर घशात वाढलेल्या पित्तामुळे सतत आंबट ढेकर येतात? ‘या’ सवयी बदलून तात्काळ मिळवा आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.