Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यावर दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

नवरात्रीच्या उपवासात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवत नाही. जाणून घ्या कमी पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारे परिणाम.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 24, 2025 | 12:03 PM
उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यामध्ये दिसून येतील 'हे' भयानक बदल

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यामध्ये दिसून येतील 'हे' भयानक बदल

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा नवरात्रीमध्ये उपवास करतात. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शरीराची योग्य काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. उपवास करताना आहारात अनेक बदल केले जातात. दिवसातून एकदा किंवा दोनदाच अन्नपदार्थांचे सेवन केले जाते. देवीची मनोभावे पूजा आणि भक्ती करताना शरीराची सुद्धा काळजी घ्यावी. नऊ दिवसाचे उपवास करणे वाटते तितके सोपे नाही. उपवास केल्यानंतर काहीवेळा शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबतच शरीरसुद्धा डिहायड्रेट होऊन जाते. काहीवेळा महिलांना थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय उपवास केल्यानंतर कमी अन्नपदार्थांचे आणि पाण्याचे सेवन केले जाते. ज्याचे परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पाण्याचे कमी सेवन केल्यामुळे चेहऱ्यामध्ये कोणते बदल दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

Navratri Fast: नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा! अन्यथा आरोग्यावर होतील गंभीर परिणाम

उपवासाच्या आधीची तयारी:

नवरात्रीमध्ये उपवास करताना शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उपवास करण्याच्या काही दिवसआधी रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले नाहीतर आरोग्याला हानी पोहचेल. शरीरात थकवा आणि अशक्तपणा वाढू शकतो.

भरपूर पाणी पिण्याचे फायदे:

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी नियमित ३ ते ४ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारते. आतड्यांमधील हालचाल सुलभ करण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. दर एक तासाने तुम्ही एक किंवा आवश्यकता वाटले तितके पाणी प्यायल्यास शरीरात कधीच थकवा, कमजोरी जाणवणार नाही. शरीर कायमच हेल्दी आणि हायड्रेट राहील.

कमी पाणी प्यायल्यामुळे शरीरावर दिसून येणारे परिणाम:

कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराचे नुकसान होते. याशिवाय आरोग्याला हानी पोहचते. कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जात नाही, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणे, त्वचा निस्तेज होणे, त्वचेची गुणवत्ता खराब होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उपवास करताना कमी पाण्याचे सेवन केल्यास इलेक्ट्रोलाइट बॅलन्स बिघडण्याची जास्त शक्यता असते. हे जर लागोपाठ ९ दिवस चालू राहिल्यास शरीराला हानी पोहचू शकते.

उपवासाच्या दिवसांमध्ये शरीरात सतत थकवा जाणवतो? मग ऊर्जा वाढवण्यासाठी ‘या’ ड्रिंक्सचे करा सेवन, कायम राहाल डिटॉक्स

FAQs (संबंधित प्रश्न)

उपवासात काय खावे?

सफरचंद, केळी, संत्री, द्राक्षे, पपई इत्यादी. साबुदाणा, राजगिरा पीठ, शेंगाचे पीठ, भगर, आरारोट पीठ इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

उपवासात काय टाळावे?

गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी, बाजरी, रवा, बेसन इत्यादी पदार्थ अजिबात खाऊ नये. उपवासात कांदा व लसूण खाणे टाळावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Drinking less water during fasting will be dangerous for the body these horrible changes will appear in the face

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 11:36 AM

Topics:  

  • benefits of fasting
  • Navratri
  • water

संबंधित बातम्या

Pune News: खडकवासला धरणक्षेत्रात रिसॉर्ट, हॉटेल मालकांची धावपळ; कुडजे परिसरातील…
1

Pune News: खडकवासला धरणक्षेत्रात रिसॉर्ट, हॉटेल मालकांची धावपळ; कुडजे परिसरातील…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.