Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! उद्भवणार नाहीत पचनाच्या समस्या, पोटाला मिळेल आराम

उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यानंतर सुद्धा अपचन होण्याची शक्यता असते.त्यामुळे उपवास सोडताना अतिशय कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 02, 2025 | 01:23 PM
नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा 'या' सोप्या टिप्स!

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा करून देवीची मनोभावे पूजा करून वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. याशिवाय नवरात्रीमध्ये महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये आहारात साबुदाणा वडे, भगर, शेंगदाण्याचे लाडू, बटाट्याची भाजी, राजगिरा लाडू इत्यादी ठराविक उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात. दिवसभरातून एकदा किंवा दोनदा अन्नपदार्थ खाल्ले जातात. याशिवाय सगळ्यांचा तिखट, गोड किंवा तळलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण अतिप्रमाणात या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय पोटात गॅस होणे, पोटात जडपणा वाटणे, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. उपवासाच्या दिवशी अतिप्रमाणात साबुदाणे खाल्यानंतर सुद्धा अपचन होण्याची शक्यता असते.

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

उत्सवाच्या कालावधीमध्ये नऊ दिवस उपवास केला जातो. या उपवासाच्या दिवसांमध्ये शरीराला अतिशय कमी प्रमाणात अन्नपदार्थ खाण्याची सवय लागते. आहारात अतिशय निवडक पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर पोटासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू नये. म्हणून शरीराची योग्य काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला नवरात्रीचा उपवास सोडताना कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. यामुळे कोणतीही पचनाची समस्या उद्भवणार नाही.

उपवास सोडताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स:

नऊ दिवस उपवास केल्यानंतर पोटाला अतिशय कमी प्रमाणात अन्नपदार्थ खाण्याची सवय लागते. याशिवाय उपवासाच्या दिवसांमध्ये अतिशय साध्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे उपवास सोडताना तेलकट किंवा अतितिखट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. याशिवाय दिवसभर कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे पचनक्रिया निरोगी राहील. पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ताक, लिंबूपाणी किंवा साध्या पाण्यात बनवलेले कोणतेही सरबत पिऊ शकता. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील.

शरीरात कँसरला जन्म देतात हे 6 पदार्थ, WHO ने केलं सावध; आवडीने खाणाऱ्या ‘या’ पदार्थांना आजपासून आहारातून करा निष्कासित

उपवास सोडल्यानंतर आहारात अतिशय साध्या आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते. फळं, उकडलेले बटाटे, राजगिरा भाकरी, शेंगदाण्याची आमटी नऊ दिवस खाल्ल्यानंतर उपवास सोडताना अतिशय कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. जेवणाच्या ताटातील पदार्थांवर तूप टाकून खाल्ल्यास खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होईल. पोटाला थंडावा देण्यासाठी केळी, गूळ, दुध इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.याशिवाय उपवास सोडल्यानंतर लगेच कोणत्याही तिखट आणि पचनास जड जाणाऱ्या पदार्थांचे सेवन न करता मऊ भात किंवा डाळ भात खावा.

FAQs (संबंधित प्रश्न)

उपवासाचे मुख्य फायदे:

उपवासाने शरीरातील चरबी कमी होते आणि स्नायूंची ताकद वाढते, कारण ग्रोथ हार्मोनचा स्त्राव वाढतो. उपवास इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारतो आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतो, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

उपवास कसा करावा?

या पद्धतीत तुम्ही ठराविक वेळेसाठी सामान्य आहार घेता आणि काही तास किंवा दिवसांच्या ठराविक वेळेसाठी उपवास करता. यात दररोज 16 तास उपवास केला जातो आणि 8 तासांच्या आत खाल्ले जाते, असे ही उपवासाची एक पद्धत आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Follow these simple tips to break the nine day fast during navratri digestion problems will not arise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • benefits of fasting
  • health care news
  • Navratri

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.