Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RO चा पाणी सतत पिणे किती फायद्याचे? ‘या’ आजारांची शक्यता

RO पाणी सतत प्यायल्याने शरीरातील आवश्यक खनिजे कमी होतात, ज्यामुळे हृदयविकार, रक्तदाब आणि अशक्तपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. WHO नेही RO पाण्याच्या अतिवापराबाबत इशारा दिला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 22, 2025 | 08:59 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. या दिनाचे उद्दिष्ट लोकांना पाण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूक करणे आहे. यावर्षीच्या जागतिक जल दिनाची संकल्पना “हिमनद संरक्षण” ही आहे, जी गोड्या पाण्याच्या पुरवठ्यात हिमनदांची भूमिका आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या संवर्धनाच्या गरजेवर भर देते.

जेवणात दोन घास जातील जास्त! कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ

शहरांमध्ये पाणी शुद्ध करण्यासाठी RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) फिल्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अनेकांना वाटते की RO फिल्टरचे पाणी आरोग्यासाठी सुरक्षित असते, परंतु ते पूर्णतः निरोगी नसून त्याचे काही दुष्परिणामही होऊ शकतात. नळाचे पाणी अनेकदा पिण्यायोग्य नसते, म्हणून RO चा वापर केला जातो. मात्र, RO प्रक्रिया पाण्यातील महत्त्वपूर्ण खनिजेही काढून टाकते, ज्यामुळे शरीराला पोषणदृष्ट्या अपुरे पाणी मिळते. RO पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखी जीवनावश्यक खनिजेही नष्ट होतात, ज्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

RO पाणी खनिजमुक्त असते, त्यामुळे ते नियमित प्यायल्याने शरीरातील खनिजांची कमतरता हृदयविकारास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे हृदयविकाराचा झटका, छातीत वेदना आणि रक्ताभिसरणाच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. RO पाणी लोह (Iron) कमी करते, त्यामुळे अशक्तपणा आणि थकवा जाणवतो. तसेच, RO पाणी घेतल्यास व्हिटॅमिन B12 ची कमतरता होऊ शकते, ज्याचा परिणाम रेड ब्लड सेल्सच्या निर्मितीवर होतो. यामुळे थकवा, चक्कर येणे, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होणे अशा समस्या होऊ शकतात.

कुणी नाकाचा आकार बदलतात, तर कुणी ओठ; बोटॉक्स सर्जरी नेमकं आहे तरी काय? अभिनेत्रीच्या खुलाशानंतर चाहतेही चकित

RO पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडवते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे डोकेदुखी, थकवा आणि अस्वस्थता जाणवू शकते. गर्भधारणेदरम्यान आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी पोषक घटक महत्त्वाचे असतात. RO पाणी सतत प्यायल्यास गर्भाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डॉक्टर उकळलेले आणि नैसर्गिक खनिजयुक्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) RO पाण्याच्या अतिवापराबाबत इशारा दिला आहे. त्यांच्या अहवालानुसार, RO पाण्याच्या दीर्घकालीन सेवनाने शरीरात पोषणतत्त्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञ RO पाणी घेतल्यानंतर ते उकळून किंवा मिनरल्स अॅड करून पिण्याचा सल्ला देतात.

Web Title: How beneficial is it to drink ro water continuously

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • drinking water tips

संबंधित बातम्या

सकाळी उठताच 1-2 बाटली पाणी घशाखाली उतरवणे किडनीसाठी होईल धोकादायक, परिणाम वाचून डोळेच फिरतील
1

सकाळी उठताच 1-2 बाटली पाणी घशाखाली उतरवणे किडनीसाठी होईल धोकादायक, परिणाम वाचून डोळेच फिरतील

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान
2

वयाच्या ६० व्या वर्षी राहाल कायम फिट आणि तरुण! पाणी पिण्याचे ‘हे’ नियम आरोग्यासाठी ठरतील वरदान

पाण्याच्या एका घोटानेच छातीत साचलेलं सर्व पित्त येईल बाहेर, काही सेकंदातच ॲसिडिटीने फुगलेलं पोट होईल रिकामं
3

पाण्याच्या एका घोटानेच छातीत साचलेलं सर्व पित्त येईल बाहेर, काही सेकंदातच ॲसिडिटीने फुगलेलं पोट होईल रिकामं

आतड्यांमधील घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे
4

आतड्यांमधील घाण क्षणार्धात पडून जाईल बाहेर! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा कोमट पाण्याचे सेवन, शरीराला होतील असंख्य फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.