Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक! जाणून घ्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नारळ पाण्याचे सेवन केले जाते. नारळ पाणी प्यायल्यामुळे त्वचा, केस आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पण अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यास आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर कोणते दुष्परिणाम दिसून येतात. याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2024 | 12:15 PM
नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक

नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक

Follow Us
Close
Follow Us:

नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा गुणकारी फायदे होतात. नारळ पाण्यात नैसर्गिक गोडवा असल्यामुळे मधुमेहासह इतर समस्या असलेले लोकसुद्धा नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे साखर युक्त पदार्थांचे सेवन न करता नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतात. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. पण जास्त प्रमाणात नारळ पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

नारळ पाण्याच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम:

पोटॅशियमची पातळी वाढते:

जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी वाढते. तसेच अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. ज्यांना हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाण्याचे सेवन करावे.

हे देखील वाचा: दिवसभराचा थकवा होईल दूर, अशी करा आंघोळ

जास्त कॅलरी:

इतर पेयांच्या तुलनेत नारळ पाण्यात खूप कमी कॅलरी असतात. पण नारळ पाण्याच्या अतिसेवनामुळे या कॅलरी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कमीत कमी नारळ पाण्याचे सेवन करावे.

नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक

हार्मोनल असंतुलन:

नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ लागतात. त्यामुळे कमीत कमी नारळ पाणी प्यावे. उच्च पोटॅशियम अल्डोस्टेरॉनच्या स्राववर परिणाम करतात. तसेच टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर परिणाम झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा: कितीही खाल्लं तरीसुद्धा वजन वाढत नाही? मग नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा

पचनक्रिया बिघडते:

नारळ पाण्याच्या अतिसेवनांमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसेच गॅस, फुगवणे किंवा इतर पचन समस्या उद्भवू शकतात. ज्या व्यक्तींना कोणत्याही आजारांबद्दल औषध चालू असतील अशांनी नारळ पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Over consumption of coconut water may cause side effects to your health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 12:15 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना
1

हिवाळ्यात सांधेदुखीचा त्रास जीवघेणा ठरतोय? घरगुती उपायांनी दूर करता येतील असह्य वेदना

ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये हाडांचं दुखणं वाढतंय, ‘या’ विटामिनच्या कमतरतेने हैराण
2

ऑफिसला जाणाऱ्या महिलांमध्ये हाडांचं दुखणं वाढतंय, ‘या’ विटामिनच्या कमतरतेने हैराण

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका
3

पुरूषांनो सावधान! Erectile Dysfunction ठरू शकते मधुमेहाचे लक्षण, वेळीच ओळखा धोका

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ
4

Male Fertility Fitness: Sperms च्‍या उत्तम आरोग्‍यासाठी १२ आठवड्यांचा रिसेट प्‍लॅन, काय सांगतात तज्ज्ञ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.