Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अति-कडक पालकत्व मुलांसाठी घातक! ‘टायगर पॅरेंटिंग’मुळे वाढतो तणाव आणि आत्मविश्वासाचा अभाव

मुलांचे संगोपन म्हणजे केवळ कडक नियम आणि यशाची सक्ती नव्हे; प्रेम, संवाद आणि समजूतदारपणा तितकेच महत्त्वाचे असतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 04:16 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मुलांचे संगोपन म्हणजे केवळ नियम लादणे किंवा यशाची अपेक्षा ठेवणे एवढ्यावर मर्यादित नसते. प्रेम, शिस्त, समजूतदारपणा आणि संवाद यांचा योग्य मेळ साधणे ही खरी कसोटी असते. मात्र, काही पालक अति-कडक भूमिका घेतात. अशाच पद्धतीला ‘टायगर पॅरेंटिंग’ असे म्हटले जाते. टायगर पॅरेंटिंगमध्ये पालकांचा भर फक्त शिस्त, आदेश आणि परिपूर्णतेवर असतो. मुलांनी कोणताही प्रश्न न विचारता आज्ञा पाळाव्यात, अभ्यासात अव्वलच यावे, चुका करण्याची मुभा नसावी, अशी अपेक्षा ठेवली जाते. या सगळ्यात मुलांच्या भावना, आवडी-निवडी आणि मानसिक गरजा दुय्यम ठरतात. परिणामी, मुलांच्या नैसर्गिक वाढीवर याचा विपरीत परिणाम होतो.

पालक-चिकन खाण्यामुळे एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू, चांगल्यातील चांगले अन्नही होऊ शकते 5 चुकांमुळे विष

नेपाळमधील त्रिभुवन विद्यापीठ तसेच ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या विविध संशोधनांमध्ये असे स्पष्ट झाले आहे की, अतिशय कठोर वातावरणात वाढलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता दिसून येते. सततच्या दबावामुळे अशी मुले तणावग्रस्त राहतात आणि मानसिक अस्वस्थतेला सामोरे जातात. पालकांना वाटते की कडक वागणूक दिल्याने मुलं यशस्वी होतील, मात्र प्रत्यक्षात हा दबाव त्यांना आतून कमकुवत बनवतो.

मुलांच्या भविष्यासाठी केवळ नियमांची यादी तयार करून उपयोग होत नाही. त्यांना समजून घेणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे आणि संवाद साधणे हे तितकेच महत्त्वाचे असते. जेव्हा पालक फक्त अधिकार गाजवतात, तेव्हा मुलांच्या मनात भीती रुजते. ही भीती पुढील आयुष्यात त्यांच्या निर्णयक्षमतेवर आणि नातेसंबंधांवरही परिणाम करते.

संशोधनानुसार, जे पालक मुलांकडून कोणत्याही चर्चेशिवाय आज्ञापालनाची आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असण्याची अपेक्षा करतात, त्यांच्या मुलांमध्ये नैराश्य आणि चिंतेचा धोका अधिक असतो. १० ते १८ वयोगटातील मुलांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या घरांमध्ये मोकळा संवाद नसतो, तिथली मुले मानसिकदृष्ट्या अधिक तणावात असतात. अति-अपेक्षांचे ओझे त्यांच्या शिकण्याच्या आनंदावरही पाणी फेरते.

टायगर पॅरेंटिंगमध्ये मुलांच्या भावनांना फारसे स्थान नसते. स्वतःचे मत मांडण्याची संधी न मिळाल्याने मुलांना असुरक्षित वाटू लागते. चुका केल्यावर कठोर शिक्षा मिळेल या भीतीने ती मुले नवीन गोष्टी करण्यापासून दूर राहतात. भावनिक आधार न मिळाल्यामुळे ती हळूहळू एकटेपणाच्या गर्तेत जातात आणि पालकांशी दुरावा निर्माण होतो.

या कडक पालकत्वाचा परिणाम फक्त मानसिक पातळीवरच होत नाही, तर शारीरिक आणि जैविक पातळीवरही होतो. ब्रिटनमधील एका अभ्यासानुसार, सततचा तणाव मुलांच्या शरीरातील जैविक प्रक्रियांवर परिणाम करू शकतो. यामुळे भविष्यात तणाव हाताळण्याची क्षमता कमी होते आणि प्रौढावस्थेत डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका वाढतो.

याउलट, ज्या पालकांचा दृष्टिकोन समजूतदार, सहकार्याचा आणि संवादावर आधारित असतो, त्यांच्या मुलांचे मानसिक आरोग्य अधिक भक्कम असते. अशा पालकत्वात नियम असतातच, पण त्या नियमांमागची कारणेही मुलांना समजावून सांगितली जातात. मुलांचे म्हणणे ऐकून घेतल्याने त्यांचा आत्मसन्मान वाढतो आणि जबाबदारीची जाणीव विकसित होते.

31 डिसेंबर स्पेशल घरी बनवा मसालेदार अन् शाही चवीचे ‘शामी कबाब’, लगेच नोट करा रेसिपी

तज्ज्ञांच्या मते, पालकांनी मुलांचे मित्र न होता प्रेमळ मार्गदर्शक असावे. घरात सुरक्षित, विश्वासाचं आणि आपुलकीचं वातावरण मिळाल्यास मुलांची सर्जनशीलता आणि निर्णयक्षमता खुलते. केवळ यशाच्या शर्यतीत ढकलण्यापेक्षा मुलांच्या मानसिक समाधानाला महत्त्व दिल्यास, ती मुले अधिक आनंदी, खंबीर आणि जबाबदार नागरिक म्हणून घडतात.

Web Title: Overly strict parenting is harmful for children

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 04:16 AM

Topics:  

  • parenting tips
  • tips for parenting

संबंधित बातम्या

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत
1

मुलाला लहानपणापासूनच स्मार्ट आणि इंटेलिजंट बनवायचंय? मग डाएटमध्ये सामील करा हे ३ सुपरफूड, ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये करतील मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.