
सावध राहा नाहीतर तुमच्याबरोबर देखील होऊ शकते फसवणूक ?
खरे जणगणना करणारे अधिकारी ओळखावेत कसे ?
जनगणनेसाठी अनेकदा शासनाची माणसं तुमच्या दाारात देऊन माहिती घेऊन जातात. पण अनेकदा या सगळ्याचा गैरफायदा घेत काही माणसं तुमची दिशाभूल देखील करतात. तुमच्याही घरी जनगणनेसाठी माणसं यायला सुरुवात झाली आहे का? मग सावध तुम्ही सावध राहायला पाहिजे. असं नाही की शासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती द्यायची नाही पण हे अधिकारी खरे आहेत की खोटे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
पालकांनी मुलांशी कसं वागावं ? कोणत्या आहेत 6 गोष्टी ज्याचा विचार करायलाच पाहिजे ?
कारण सध्या एक scam मोठ्या प्रमाणत होतोय. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात. 1 एप्रिलपासून तुमच्या घरी जनगणना अधिकारी यायला सुरुवात झाली असेल. हे अधिकारी तुम्हाला तुमच्या कुटुंबाबाबत अगदी साधे आणि सोपे प्रश्न विचारतील. पण हे प्रश्न नेमके कोणते आहेत आणि फसवणूक करणारे अधिकारी कोणते प्रश्न विचारणार आहेत हे आपण जाणून घेऊया.
आता सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया की तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तुमच्या घरात किती माणसं राहतात? पिण्याचं पाणी तुम्हाला कुठून मिळतंय? तुमच्या घरात TV, laptop, fridge अशा कोणत्या सुविधा आहेत? तुम्ही राहत असणारे घर तुमचे स्वतःचे आहे की भाड्याचे आहे? हे साधे आणि सोपे प्रश्न जर जनगणना अधिकारी तुम्हाला विचारत असतील तर या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बिनधास्त द्या.
पण यानंतर फसवणूक करणारे अधिकारी तुम्हाला कोणते प्रश्न विचारू शकतात हे सुद्धा आपण जाणून घेऊया. कोणत्या गोष्टी सांगणं ठरू शकतं घातक? बँकेचं खाते क्रमांक, तुमचे ration card व आधार card, PAN card क्रमांक विचारल्यास नक्कीच धोका आहे. कोणत्याही प्रकारचं OTP देणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. लक्षात ठेवा की खरे जनगणना अधिकारी जे असतात ते यापैकी तुम्हाला काहीही विचारत नाहीत. पण तुम्ही जर या प्रश्नांची उत्तरं दिलीत आणि OTP दिला तर तुमच्या खात्यातली सगळी रक्कम एका क्षणात गायब होऊ शकते.
हा कोणत्याही प्रकारचा एक scam असू शकतो. त्यामुळे वेळेत सावध रहा. याशिवाय फसवणूक करणारे अधिकारी अजूनही एक प्रकार शोधून काढतात. तो नेमका काय आहे तेही जाणून घेऊया. तुम्हाला एखादं app उघडायला सांगतील आणि त्यातील link वर click करायला प्रवृत्त करतील. याशिवाय तुमचा data verify करायचा आहे असंही तुम्हाला सांगतील. पण तुम्ही त्यांच्या जाळ्यामध्ये अजिबात फसू नका. कारण या link वर click केल्यास तुमची आयुष्यभराची कमाई ही एका क्षणात गायब होईल. सुरक्षितता आणि जागरूकताच तुम्हाला या scam पासून दूर ठेवू शकते.
आता थांबायचं नाय ! तृतीयपंथीय मुलांच्या पालकांसाठी सरकारचा मदतीचा हात, काय आहे ‘ही’ योजना ?