Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ चविष्ट कांजीचे सेवन, शरीर राहील हायड्रेट

उन्हाळा वाढल्यानंतर शरीरात उष्णता वाढू लागते. या वाढत्या उष्णतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. अशावेळी आहारात कांजीचे सेवन करावे. चला तर जाणून घ्या उन्हाळ्यात कोणती पेय प्यावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 08, 2025 | 12:02 PM
उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' चविष्ट कांजीचे सेवन

उन्हाळ्यातील धोकादायक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा 'या' चविष्ट कांजीचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्ती सतत काहींना काही करत असते. कधी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते तर कधी नियमित व्यायाम, ध्यान करून आरोग्य सुधारले जाते. मात्र वातावरणात सतत होणारे बदल आणि चुकीची जीवनशैली अनेक आजारांचे कारण बनते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी कमी होऊन जाते. संपूर्ण शरीर डिहायड्रेट झाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. डिहायड्रेशनची समस्या उद्भवू लागल्यानंतर सतत डोकं दुखणे, उलट्या,चक्कर, थकवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी उन्हाळ्यात आहारामध्ये थंड पेयांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – pinterest)

वाढत्या प्रदुषणामुळे दम्याच्या रूग्णात ४० टक्क्यांनी वाढ, दीर्घकाळ खोकला ठरू शकते दम्याचं लक्षण

रोजच्या आहारात थंड पेयांचे सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही. याशिवाय शरीराला पुरेसे पाणी मिळते. उन्हाळ्यामध्ये आहारात कांजीचे सेवन करावे. कांजीचे सेवन केल्यामुळे शरीर कायम निरोगी राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कोणत्या कांजी पेयांचे आहारात नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

काकडीची कांजी:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रोजच्या आहारात नेहमीच काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये भरपूर पाणी असते. ९० टक्के पाणी काकडीमध्ये असल्यामुळे उन्हाळ्यात डॉक्टरसुद्धा काकडी खाण्याचा सल्ला देतात. काकडी खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय शरीरात वाढलेली जळजळ आणि पिंपल्सच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित काकडी खावी. काकडी कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या काचेच्या बाटलीमध्ये पाणी घेऊन त्यात काकडीचे गोलाकार कापून घेतलेले तुकडे घाला. नंतर त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, चिमूटभर काळीमिरी पावडर आणि जिऱ्याची पावडर मिक्स करा. त्यानंतर काचेची बरणी कॉटनच्या कपड्याने बांधून ठेवा. कडक उन्हात किंवा रात्रभर ठेवून सकाळी उठल्यानंतर कांजीचे सेवन करावे. या कांजीचे नियमित सेवन केल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

भाताची कांजी:

भाताची कांजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. भाताची कांजी बनवताना सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात शिजवलेले भात घेऊन त्यात पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, बारीक उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.त्यानंतर फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी आणि हिंग घालून भाजा. गॅस बंद करून त्यात कढीपत्ता आणि जिरं टाकून तयार केलेली फोडणी मिश्रणात टाका. अशा पद्धतीने तयार करा भाताची कांजी.

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सवयी, कधीच उद्भवणार नाही मधुमेहाची समस्या

बीट कांजी:

बीट कांजी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. बीट खाल्यामुळे शरीरातील कमी झालेले रक्ताचे प्रमाण वाढून थकवा, अशक्तपणा दूर होतो. बीट कांजी नियमित प्यायल्यास शरीरातील थकवा दूर होईल, पचनक्रिया सुधारेल इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळेल. बीट कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटचे पातळ तुकडे करून गरम केलेल्या पाण्यात टाका. त्यानंतर पाणी व्यवस्थित उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी पावडर, मोहरी, हिंग आणि लाल तिखट घालून मिक्स करा. काचेच्या भांड्यात तयार केलेली कांजी झाकून ३ दिवस उन्हात तशीच ठेवा. यामुळे कांजीची चव अतिशय सुंदर लागेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stay hydrated and prevent summer illnesses with this delicious kanji in your diet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • summer care tips
  • summer drink
  • summer heat

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.