
हवामान बदलाच्या सर्व प्रमुख कारणांपैकी शेतीसाठी रसायनांचा आणि किटकनाशकांचा अंदाधुंद वापर हेही एक प्रमुख कारण आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांपासून सेंद्रिय शेतीचा ट्रेंड वाढत चालला आहे. देशभरातील लाखो शेतकरी आज सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. सरकारकडून सेंद्रिय शेतीलाही सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. देशभरातील लाखो शेतकऱ्यांनी आज सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे आणि काही नवीन शेतकऱ्यांना ती करायची आहे, पण त्यांना त्याबाबत योग्य माहिती नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीचांही सामना करावा लागत आहे.
सेंद्रिय शेतीतून चांगले उत्पादन मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आत्यंत आवश्यक असते. सेंद्रिय शेतीमध्ये डीएपी-युरियासारख्या खतांऐवजी कुजलेले शेणखत किंवा शेणखताचा वापर केला जातो. सेंद्रिय शेतीतही जीवामृत वापरले जाते. जीवामृत हे द्रव स्वरूपात असते, जे शेण, गोमूत्र, गुळाचे पाणी आणि बेसन मिसळून तयार केलेले द्रावण आहे. कडुलिंबाची पाने उकळून तयार केलेले द्रवाची कीटकनाशक म्हणून फवारणी केली जाते.
मंत्रिपद मिळाले नसले तरीदेखील हिवाळी अधिवेशनाला हजेरी
सेंद्रिय शेतीमध्ये किती खत टाकले जाते याची माहिती बहुतेकांना नसते. तुम्ही पहिल्यांदा सेंद्रिय शेती सुरू करणार असाल तर पेरणीपूर्वी एक एकर शेतात किमान 10 क्विंटल गांडूळ खत टाकावे. त्यानंतर पिकाला पहिले पाणी देताना 5 क्विंटल खत द्यावे लागते. गरज भासल्यास पिकाला मोहोर येण्यापूर्वी 2 क्विंटल खत देता येते. सेंद्रिय शेती सुरू केल्यानंतर पुढील वर्षीपासून सुमारे 7 क्विंटल खत पेरणीपूर्वी द्यावे आणि त्यातील अर्धे 3.5 क्विंटल खत पहिल्या सिंचनानंतर द्यावे.
जीवामृत सिंचनासोबत पाण्यात विरघळवून दिले जाते. हे जीवामृत शेण, गोमूत्र, गुळाचे पाणी आणि बेसन मिसळून बनवलेले द्रावण आहे. हे द्रावण शेताच्या सिंचनासाठी पाण्यात मिसळले जाते. एक एकर शेतात पाणी देण्यासाठी सुमारे 200 लिटर जीवामृत दिले जाते. कडुलिंबाची पाने उकळून या द्रावणात जवळजवळ दुप्पट पाणी घाला आणि कीटकनाशक म्हणून झाडांवर फवारणी करा.
शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट: महाराष्ट्रातून नेलेली ‘ही’ गोष्टी दिली भेट
सेंद्रिय शेतीबाबत सर्वकाही माहिती झाल्यानंतर आता सेंद्रिय शेतीचे फायदेही जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढेल. गांडूळ खत आणि जीवामृत वापरल्याने जमिनीत निरोगी जीवाणू वाढतील ज्यामुळे मातीची सुपिकता अधिक वाढेल आणि पाण्याची पातळीही टिकून राहील.
सेंद्रिय शेती केल्यास जमिनीशिवाय भूगर्भातील पाणी आणि हवेचाही मोठा फायदा होणार आहे. रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रिय शेतीतून मिळणारी उत्पादने अधिक फायदेशीर असतात जी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या वस्तूंचा सतत वापर करून तुम्ही अनेक गंभीर आजार टाळू शकता.