Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात घटस्फोटाचे प्रमाण जास्त का वाढले आहे? ‘ही’ आहेत 5 मोठी कारणे

सध्याची बदलती लाइफस्टाइलमुळे आपल्या आजूबाजूच्या समाजावर सुद्धा परिणाम होत आहे. तुम्ही जर नीट लक्ष पूर्वक आजूबाजूला पाहिले तर एका गोष्ट वारंवार आपल्या कानावर पडते. ती म्हणजे घटस्फोटाची घटना. पण हे असे का होत आहे? चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 11, 2024 | 08:12 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

भारतात नेहमीपासूनच लग्नाला एका पवित्र व धार्मिक काय मानले गेले आहे. भारत हा एका पारंपरिक देश आहे. त्यामुळेच आपल्याकडे लग्न फक्त दोन व्यक्तींचे एकत्र येणे नसून एका सोहळा असतो. पूर्वी लग्न म्हणजे एका प्रकारचा विश्वास होता, जिथे नवरी मुलगी नवरा मुलावर विश्वास ठेऊन गृह प्रवेश करायची व वर्षोनुवर्षे दोघे आपला संसाराला हातभार लावायचे.

भारतीय संस्कृतीत आपण नेहमी ऐकतो की लग्नाच्या गाठी या स्वर्गातच जुळून येत असतात, जे खरंच आपल्याकडे लग्न किती पवित्र आहे हे अधोरेखित करून देते. पण आज याच लग्नातल्या गाठी अस्सल आयुष्यात तुटत आहे. एके काळी जिथे 30-40 वर्षांचा सुखाचा संसार चालायचा तोच आज एक दोन वर्षात मोडत आहे. यामागचे कारण आपल्यासाठी जाणून घेणे महत्वाचे आहे.

घटस्फोटाच्या वाढत्या घटनांमागील कारण

व्यस्त जीवन

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे पती-पत्नीमध्ये हवा तसा संवादच होत नाही. जर पती-पत्नी दोघेही ऑफिसात कामं करत असेल आणि दोघांची वेळ ही वेगळी असेल, तर भावनिक अंतर वाढते, जे कधीकधी गैरसमजाचे कारण बनते. अशा परिस्थितीत घटस्फोट घेणे आश्चर्यकारक नाही.

सामाजिक विचारात बदल

पूर्वी घटस्फोट हा एक वाईट डाग मानला जात होता. तसेच यावर लोकं काय म्हणतील असा विचार कित्येकांच्या मनात येत होता. त्यामुळे पूर्वी घटस्फोटाचा निर्णय घेणे कोणालाही सोपे नव्हते, परंतु हळूहळू त्याला समाजात मान्यता मिळत आहे. आता लग्न मोडणे इतके विचित्र राहिलेले नाही, विशेषतः शहरी भागात.

महिलांमध्ये जागरूकता पसरली

गेल्या काही दशकांमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे, त्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम बनण्याची संधी मिळाली आहे. आज प्रत्येक तरुणी तिच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकते. पूर्वी मुलींना मर्जीशिवाय त्याचे लग्न केले जायचे पण आज ही स्तिथी पूर्णपणे बदलली आहे. जेव्हा त्यांना लग्नानंतर सुद्धा घुसमटल्यासारखे वाटते, तेव्हा त्या स्वतःच्या निर्णयाने घटस्फोट घेतात.

इगो प्रॉब्लम

आजकाल अनेकदा असे दिसून येते की पती-पत्नी दोघांनाही अहंकार म्हणजेच इगोचा त्रास जास्त असतो. एक व्यक्ती रागावलेली असेल आणि दुसरी शांत राहून त्याचा राग समंजसपणे हाताळाळते तेव्हाच नातं टिकतं. अहंकारामुळे जर नवरा बायको पुन्हा पुन्हा शत्रूसारखे भांडत असेल तर लग्न टिकणार नाही हे उघड आहे.

प्रेमविवाहात वाढ

पूर्वीच्या काळी, लग्न हे सहसा आई-वडील आणि कुटुंबातील ज्येष्ठ नातेवाईक ठरवत असत, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा कलह झाला तर लग्न वाचवण्याची जबाबदारी त्यांची होती. आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रेमविवाह होत आहेत. प्रेमविवाहाबाबत तरुणांची जी स्वप्ने असतात ती अनेकदा लग्नानंतर भंगली जातात. अशा परिस्थितीत, ते स्वतः घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.

Web Title: Why divorce rate in india is so high these are big reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 08:12 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.