Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेडपी सीईओंसह २० हजार अधिकारी-कर्मचारी गायब; पंढरी स्वच्छतेची परंपरा मोडीत

जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर जि.प. सीईओंसह अधिकारी स्वःत हाती झाडू घेऊन स्वच्छता करत असतात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 15, 2022 | 07:46 PM
झेडपी सीईओंसह २० हजार अधिकारी-कर्मचारी गायब; पंढरी स्वच्छतेची परंपरा मोडीत
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : जिल्हा परिषदेने स्वच्छतेच्या आषाढी वारी (Ashadhi Wari 2022) परंपरेला छेद दिला आहे. सोलापूर जि.प. सीईओंसह २० हजार अधिकारी कर्मचारी स्वच्छतेपासूून गायब असल्याची चर्चा जोर धरली आहे. पंढरी वारी संपल्या नंतर जि.प. सीईओंसह अधिकारी स्वःत हाती झाडू घेऊन स्वच्छता करत असतात. यंदा मात्र फक्त दिखाऊपणा झाल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पारंपारिक अधिकाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेला छेद दिल्याचे ग्रामीण भागातून बोलले जात आहे.

प्रशासनातर्फे पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी निर्मल वारीचा डंका पिटवला गेला. पालखी सोहळ्यादरम्यान हा उपक्रम चांगला राबवला गेला. पण यात्रा पार पडल्यानंतर मार्गावरील स्वच्छतेचा जिल्हा परिषदेला विसर पडल्याचे दिसून आले आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षानंतर यंदा प्रथमच आषाढी वारी सोहळा झाला. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. मानाच्या पालख्या व दिंड्यामध्ये वारकरी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसून आले. तुकोबाराय व माऊलीच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर जिल्हा परिषद प्रशासनातर्फे निर्मल वारीचा प्रयोग दरवर्षी राबवला जातो. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना स्वच्छतागृहाची सेवा पुरवण्यासाठी तात्पुरत्या स्वच्छतागृहासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी पुरवला जातो.

आषाढीवारी दरम्यान निर्मलवारी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. तो यंदाही चांगल्या पद्धतीने राबविला गेला. याचे मान्यवरांनी कौतुक केले. पण वारी पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांतर्फे मार्गावरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जाते. यावेळेस अशा स्वच्छता मोहिमेचे नियोजन झालेच नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले. दरवर्षीची परंपरा मोडल्याबद्दल काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत ‘नवराष्ट्र’शी बोलताना नापसंती ही व्यक्त केली आहे.

जबाबदारी कोणाची?

वारीनंतर स्वच्छता उपक्रम राबवायची याची जबाबदारी कोण घेणार हे जिल्हा परिषद प्रमुखांना सांगण्यात आलेच नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दिलीप स्वामी हे वारीदरम्यान आजारी पडले. त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत आणि प्रशासन गाफीलच राहिल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालयात फेरफटका मारून वारी नंतरचे स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आले आहे काय? याची खातरजमा केल्यावर याबाबत कोणाला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले.

काही जणांनी वारीदरम्यान पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे गरज वाटत नसल्याचे सांगितले. काही जणांनी हा उपक्रम गरजेचा होता, कारण परंपरा खंडित होता कामा नये अशीही प्रतिक्रिया दिली. पालखी मार्गावर कचरा साठलेला असतो तो अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्रमदानाने गोळा करून स्वच्छता अभियान यशस्वी करता आले असते असेही सांगण्यात येत आहे. पाऊस असला तरी याबाबत आधीपासूनच नियोजन होणे गरजेचे होते अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: 20 officers employees missing including zp ceo in sanitation mission nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2022 | 07:32 PM

Topics:  

  • Ashadhi Wari 2022
  • दिलीप स्वामी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.