Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी ४,००० क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2025 | 01:50 PM
चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

चासकमान धरणातून 2200 क्युसेक विसर्ग सुरू; भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Close
Follow Us:

चासवाडा : खेड तालुक्याच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण जलसाठा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. ७) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणातून एकूण २२०० क्युसेकने विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला.

धरणाचे तीन दरवाजे प्रत्येकी २० सेमीने उचलून १८०० क्युसेक पाणी सांडव्याद्वारे, तर सकाळी ११ वाजता ४०० क्युसेक पाणी अतिवाहिनीद्वारे नदीत सोडण्यात आले. सध्या धरणात ८०.८९% म्हणजे ७.०८८ टीएमसी जलसाठा असून उपयुक्त साठा ६.१२ टीएमसी इतका आहे.

पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

भीमाशंकर अभयारण्य आणि पश्चिम घाट परिसरात दमदार पावसाचा जोर कायम असून, २४ तासांत २३ मिमी आणि आतापर्यंत एकूण ३९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भीमा व आरळा नद्यांद्वारे दररोज सरासरी ४,००० क्युसेक पाण्याची आवक होत आहे. मागील वर्षी याच तारखेला केवळ ११.८६% साठा असलेले हे धरण यंदा ७०% अधिक साठ्याने परिपूर्ण झाल्याने खेड आणि शिरूर तालुक्यातील पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पश्चिम भागात बंधाऱ्यांचा अभाव

धरण भरले असले तरी पश्चिम भागातील शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नाही, कारण नद्यांवर बंधाऱ्यांचा अभाव आहे. पाणी कालव्यांमार्फत फक्त पूर्व भागातील शिरूर आणि खेड तालुक्यांपर्यंतच पोहोचते.

भातपिकांचे मोठे नुकसान

मेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी रोपे कुजली आहेत, तर काही ठिकाणी रोपवाटिकाच तयार झालेली नाही. परिणामी, भात रोपांची किंमत वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरण साखळी परिसरात पावसाचा जोर कायम असल्यामुळे विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पाणीपातळीचे आकडेवारी विवरण

सध्याची पाणीपातळी : ६४७.१५ दशलक्ष घनमीटर
एकूण साठा : २००.७० द.घ.मी.
उपयुक्त साठा : १७३.५१ द.घ.मी.
कळमोडी धरणाची आवकही आरळा नदीमार्गे चासकमानमध्ये होत आहे.

Web Title: 2200 cusecs of water released from chaskaman dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 01:50 PM

Topics:  

  • maharashtra news
  • water issues

संबंधित बातम्या

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे
1

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
2

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा
3

Maharashtra Digital Governance: कागदपत्रांची गुंतागुंत होणार कमी! राज्यात E-Bond सुविधा सुरू; बावनकुळे यांची मोठी घोषणा

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार
4

‘परंपरा खंडित होऊ देणार नाही, भगवान गडावर दसरा मेळावा होणारच’; पंकजा मुंडेंचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.