
अहिल्यानगर तालुक्यातील सारोळा कासार अकोळनेर शिवेलगत असलेल्या जांभळदरा परिसरात १४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वणवा पेटून मोठी आग लागली. या आगीत परिसरातील ९ शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे व इतर प्रकारची झाडे होरपळून निघाली, तर या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबकचे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईनही जळाल्या असून या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी ३ च्या सुमारास लमाणबाबा देवस्थान पासून काही अंतरावर असलेल्या डोंगरावर अचानक वणवा पेटला.
दुपारी वेळ आणि कडक उन त्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. डोंगरावरून ही आग जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरली. परिसरातील नागरिकांना आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. मात्र आग विझवण्यासाठी कुठलीही साधने उपलब्ध नसल्याने आणि आगीने रौद्र रूप धारण केलेले असल्याने नागरिकांना काहीच करता आले नाही.
आग कशामुळे लागली, की कोणी लावली याची प्रशासनाने सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यानी केली आहे. कोणी सिगारेट ओढून तेथे टाकून दिली असावी किवा मुद्दामहून आग लावली असावी अशीही शंका शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करावी, तातडीने पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
दुपारी वेळ आणि कडक उन त्यामुळे आगीने काही काळातच रौद्र रूप धारण केले. डोंगरावरून ही आग जवळच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पसरली. परिसरातील नागरिकांना आगीच्या ज्वाला व धुराचे लोट दिसू लागल्यावर नागरिकांनी तिकडे धाव घेतली. या आगीत परिसरातील ९ शेतकऱ्यांच्या शेतातील फळझाडे व इतर प्रकारची झाडे होरपळून निघाली, तर या शेतकऱ्यांच्या शेतातील ठिबक चे पाईप, शेततळ्याचे कागद, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईनही जळाल्या असून या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
या आगीत सुधाकर रंगनाथ धामणे यांच्या शेतातील चंदन, कडूनिंब, मलबारलिंब आदी झाडे, विशाल मधुकर धामणे, सुभाष भास्कर धामणे, विलास गंगाधर धामणे, वनाजी गंगाधर धामणे या शेतकऱ्यांच्या शेतातील चिंचेची झाडे, संजय आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील संत्र्याची बाग, ज्ञानदेव भाऊसाहेब धामणे व पोपट भाऊसाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याची बाग, राजेंद्र आप्पासाहेब धामणे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले आहे. या शिवाय या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात ठिबक सिंचनाचे अंथरलेले पाईप, विहिरी, बोअरवेलच्या पाईपलाईन, शेततळ्यातील कागद व पाईपलाईन आदी शेती साहित्य जळन मोठे नकसान झाले आहे.