Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उद्धव ठाकरेंच्या पक्षाला का लागली आहे गळती? अंबादास दानवे यांनी स्पष्टच सांगितले कारण

अंबादास दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 14, 2025 | 05:45 PM
'भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर...'; अंबादास दानवे यांचे मोठं विधान

'भाजप स्वतःला मोठा पक्ष म्हणवतो, पण इतर...'; अंबादास दानवे यांचे मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी लागला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते नाराज असून एकमेकांवर आरोप करत आहेत. यामध्ये ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. राजन साळवी यांनी देखील शिवबंधन मोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे. राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे पक्ष सोडून जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसत आहे. शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहे? त्याचे कारण शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे म्हणाले की, समोरच्या लोकांनी बाजार मांडला आहे. पैशांची ऑफर दिली जाते. कामांची ऑफर दिली जात आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात आहे. या सगळ्या लोकांनी मांडला आहे. बाजारात मांडलेले लोक जात असतील तर याचा आम्हाला अजिबात दुःख नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागण्याचे कारण सांगितले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा खरपूस समाचार घेतला. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विमाबाबत वक्तव्य करताना वादग्रस्त विधान केले. यावरुन टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, कृषिमंत्री भिकाऱ्यांची उपमा शेतकऱ्यांना देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्यांच्याबाबत ही भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

ऑपरेशन टायगर थांबणार नाही असे योगेश कदम म्हणाले होते, त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “योगेश कदम यांना काही माहीत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांना अजून संघटनाही माहीत नाही. बापाच्या बळावर काम करणे सोपे असते. पण संघटना उभी करणे अवघड असते. या प्रकारच्या घोषणा आणि वल्गना करणारे खूप आले आणि गेले आहेत. उद्धव साहेबांचे नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात उभा राहील,” असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे अंबादास दानवे म्हणाले की, बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची अशी दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची आहे. त्यांना बीडचा बिहार करायचा आहे.धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्यास जाणार याचा अर्थ बरेच पाप त्यांनी केलेले असतील. ते धुवायला चालले असतील. त्याच्यावर काय बोलावे, असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

Web Title: Ambadas danve give reason why leader detach from thackeray group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 05:45 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Rajan Salvi
  • Thackeray Group

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.