Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रकल्पांमध्ये 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Apr 28, 2025 | 11:15 PM
प्रकल्पांत 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

प्रकल्पांत 45 टक्केच जलसाठा; मेळघाटात जलसंकट, टँकरद्वारे पाणीपुरवठा

Follow Us
Close
Follow Us:

अमरावती जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा जवळपास निम्म्याहून कमी म्हणजे 45.24 टक्यांवर आला आहे. मे महिन्यातील तीव्र उन्हाला अजून काही दिवस शिल्लक आहेत. तत्पूर्वीच जिल्ह्याभरातील जलसकंट तोंड वर काढत आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात, तर पाण्यासाठी हाहाकार सुरु झाला आहे. बराचश्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु झाला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनीत जाणारे रस्ते आणि जल प्रवाह यांना एरिना कल्पतरू कंपनी कडून अडथळे, शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे तक्रार

विदर्भपाटबंधारे विकास महामंडळ (नागपूर) अंतर्गत स्थानिक जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील 1 मोठे, 7 मध्यम आणि 48 लघु प्रकल्पांसह एकूण 56 जलप्रकल्पांची पाणीसाठा क्षमता 1047.30 दशलक्ष घनमीटर दलघमी आहे. ज्यामध्ये 473.84 दलघमी पाणी आहे. आगामी काळात तीव्र उन्हाच्या झळामुळे पाणीसाठा आणखी कमी झाल्याने जलसंकट गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तथापि, 564.05 दलघमी क्षमतेचा एकमेव मोठा प्रकल्प मोर्शीच्या अप्पर वर्धा प्रकल्पात 273.03 दलघी म्हणजेच 48.41 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मेळघाटात पाणी संकटाचा सामना

मेळघाटातील अनेक गावांमध्ये पाण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. चुर्णी गावात तर 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामपंचायतीकडून कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने, चुर्णीतील रहिवाशांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

कडक उन्हापासून दिलासा मिळणार

, मराठवाडा तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक मार्गे मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाची द्रोणिय स्थिती आहे (कमी दाबाचा पट्टा). राजस्थान आसाम वर चक्राकार वारे वाहत आहेत. पश्चिमी विक्षोभ आणि द्रोणिय स्थिती यांच्या प्रभावाखाली 30 एप्रिलपर्यंत विदर्भात काही ठिकाणी तुरळक प्रमाणात, तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या/मध्यम पाऊस व विजांचा गडगडाट आणि वेगवान वाऱ्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. 28) संपूर्ण विदर्भात तुरळक ते विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाची शक्यता. आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर जास्त राहील. 29 एप्रिल ते 1 मेपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. यादरम्या पुढील तीन दिवसात कमाल तापमानात घट येण्याची आणि त्यानंतर वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली.

Maharashtra Weather: महाराष्ट्रावर घोंघावतेय दुहेरी संकट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट

50 गावात तर 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक व महिला त्रस्त आहेत. गेल्या महिनाभरापासून नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. गावातील पाणीपुरवठा योजनेची विहीर कोरडी पडली आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई आहे.

73 गावांमध्ये 33 बोअरवेल व 55 विहिरींतून पाणीपुरवठा

उष्णतेच्या लाटेमुळे सगळीकडील जलस्तर घटत आहे. सद्या स्थितीत जिल्ह्याचा पारा 44 अंशावर गेला आहे. त्यामुळे जलस्त्रोतातील पाण्याचे वाष्पीभवन वाढलेले आहे. त्यामुळे 84 गावांमध्ये पाणीबाणी निर्माण झलेली आहे. उपाययोजना म्हणून 10 गावांमध्ये 18 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर 73 गावांमध्ये अधिग्रहणातील 33 बोअरवेल व 55 खासगी विहिरींच्या माध्यमातून नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

 

Web Title: 45 percent water storage in amravati district dam water crisis increase

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:07 PM

Topics:  

  • amaravati news
  • Dam Water Level
  • Water problem

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.