Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्यक्त केली नाराजी, स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा

मिलिंद देवरा, बाबा सिद्धकी, संजय निरुपम हे काँग्रेसचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जात होते.अशातच काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने हायकमांडवर नाराजी व्यक्त केली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 27, 2024 | 11:08 AM
मुंबईतील काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्यक्त केली नाराजी, स्टार प्रचारकपदाचा दिला राजीनामा
Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक महिन्यांपासून काँग्रेस (Congress) पक्षाचे चित्र बदलताना दिसत आहे. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बड्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. लोकसभा निवडणुकीच्या आधी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि इतर पक्षात प्रवेश केला. मुंबईतील या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर काँग्रेसचे रूप बदलले आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्धकी, संजय निरुपम हे काँग्रेसचे प्रमुख चेहरे म्हणून ओळखले जात होते.अशातच काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्याने हायकमांडवर नाराजी व्यक्त केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नसीम खान(Naseem Khan) हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र त्यांच्याऐवजी या मतदार संघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यांना उमेदवारी दिल्यानंतर नसीम खान यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. अशातच त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा हायकमांडवर पाठवला आहे.

नसीम खान यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्रमध्ये पक्षाचा प्रचार करण्याची जबाबदारी दिली आहे. मी ती जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागा असे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री, जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. मात्र आता या जागेवर वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काँग्रेसने महाराष्ट्रात एकही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको,असे कसे चालू शकेल? असा सवाल नसीम खान यांनी उपस्थित केला आहे. उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेसच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मी देखील नाराज असल्याचे नसीम खान यांनी सांगितले आहे.

Web Title: Big congress leaders in mumbai expressed their displeasure resigned from the post of star campaigner nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • Congress
  • Election
  • Varsha Gaikwad

संबंधित बातम्या

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
1

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप
2

Voter Adhikar Yatra: ‘महाराष्ट्रात १ कोटी नवीन मतदार तयार झाले’, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट आरोप

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू
3

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा
4

पंतप्रधान मोदींकडून ‘RSS’ चं कौतुक! त्रास मात्र काँग्रेसला; खासदाराने संघाला दिली ‘तालिबान’ची उपमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.