Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Brahmin Reservation: “ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे…”; माधव भंडारींचे मोठे विधान

कल्याणमध्ये ब्राह्मण सभेतर्फे राज्यभरात निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण सभेतर्फे समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 06, 2025 | 02:26 PM
Brahmin Reservation: "ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे..."; माधव भंडारींचे मोठे विधान

Brahmin Reservation: "ब्राह्मण समाजाला आरक्षणाची गरज नाही, जिथे जाऊ तिथे..."; माधव भंडारींचे मोठे विधान

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे: भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी ब्राह्मण समाजाबद्दल एक मोठे विधान केले आहे. ब्राह्मण समाजासंदर्भात त्यांनी आरक्षणाविषयी भाष्य केले आहे. माधव भंडारी ही भाजपचे माजी प्रवक्ते आहेत. ब्राह्मण समाजाने कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत ब्राह्मण समाजाचा वाट दुर्लक्ष करण्यासारखा नाहीये. देशातील उद्योगांच्या उभारणीत ब्राह्मण समाजाचे योगदान फार मोठे आहे, असे भाजपचे माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले आहेत. माधव भंडारी कल्याणमधील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

कल्याणमध्ये ब्राह्मण सभेतर्फे राज्यभरात निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. ब्राह्मण सभेतर्फे समाजातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माधव भंडारी बोलत होते. देशात समाजासाठी अनेक चळवळी झाल्या, त्या उभ्या करणारे बहुतेक ब्राह्मण होते. त्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज नाही. आम्ही जिथे जाऊ तिथे आमचे स्थान निर्माण करू, असे माधव भंडारी म्हणाले.

कल्याण ब्राह्मण सभेतर्फे आचार्य अत्रे सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार किरण सामंत, आमदार संजय केळकर, भाजप नेते माधव भंडारी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशीष दामले, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “राजकरणामध्ये संख्येचा आणि पैशांचा टक्का पाहिला जातो. जोपर्यंत आपला टक्का वाढणार नाही तोवर आपल्याला अपेक्षित असे यश मिळणार नाही. आता आपण साडे दहा – अकरा टक्क्यांमध्ये आहोत. हा आकडा काही कमी नाही. गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समजाचा अपमान करण्याची मोहीम एका विशिष्ठ वर्गाकडून सुरू आहे. ते पाहिल्यानंतर आता गप्प राहून चालणार नाही असे वाटत आहे.”

पुढे बोलताना भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी म्हणाले, “पूर्वी काय इतिहास होता त्याला अर्थ नाही.  हे केवळ आपल्याबद्दल नाहीये. मात्र समाजामधील एखाद्या घटकाला अपमान , वागणे सहन करावे लागत असेल तर बरोबर नाही. आपण ब्राह्मण आहोत म्हणून कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही. गावांमध्ये राहणाऱ्या ब्राह्मण समाजाला संरक्षणाची गरज आहे. त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी यांनी आपली ताकद वापरणे आवश्यक आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सुमारे 200 कोटी मागितले पाहिजेत.” परशुराम आर्थिक महामंडळासाठी 200 कोटी मागितले पाहिजेत अशी मगआणि भाजप नेते आणि माजी प्रवक्ते माधव भंडारी यांनी अध्यक्ष आशीष दामले यांच्याकडे केली.

Web Title: Bjp leader and former spokeperson madhav bhandari said does not need to reservation for brahmin community kalyan event thane marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • kalyan

संबंधित बातम्या

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप
1

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत
2

Kalyan crime: ‘आमच्याकडे काय बघतोस?’ म्हणत विद्यार्थ्यावर प्राणघातक चाकूहल्ला; परिसरात दहशत

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
3

Kalyan Crime: आई-बाबा यापुढे मी…; बारावीच्या परीक्षेच्या भीतीने विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल

Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली
4

Kalyan News: श्वान चावल्यानंतर रेबिजच्या भीतीतून बँक कर्मचाऱ्याची आत्महत्या; सुसाईड नोट सापडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.