
कर्जमुक्तीचे १७५ कोटी ७८ लक्ष रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त; २३ हजार ५०८ शेतक-यांचा समावेश
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या या योजनेत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (सीडीसीसी) 36 हजार 757 पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झाली होती.
यापैकी 23 हजार 508 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी 175 कोटी 78 लाख 55 हजार 144 रुपये सीडीसीसी बँकेला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात बँकांना निधी वितरित करण्यात आला. या प्रक्रियेत चंद्रपूर जिल्ह्यातील सीडीसीसी बँकेच्या 23 हजार 508 शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
महाबळेश्वरमध्ये पावसाचा धुमाकूळ; वेण्णा तलाव ओव्हरफ्लो, आंबेनळी घाटात दरडी तर पर्यटकांची तुफान गर्दी
कर्जमाफीचा लाभ मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामातील शेतीची कामे करण्यासाठी पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी नव्याने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्जाच्या ओझ्यातून मुक्त झालेल्या शेतकऱ्यांना आगामी शेती हंगामासाठी आर्थिक पाठबळ मिळण्याची अपेक्षा आहे.
योजनेची अंमलबजावणी करताना तांत्रिक अडचणी आणि दिरंगाई टाळण्यासाठी प्रक्रिया डिजिटल आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात आहे. शासनाने निश्चित केलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे.
शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. यासाठी जवळच्या सहकारी संस्था, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) किंवा संबंधित सेवा केंद्राशी संपर्क साधता येणार आहे.
Washim News: वाशिम जिल्ह्याच्या जलसाठ्यात वाढ; मध्यमप्रकल्पात २५.५६ टक्के जलसाठा
योजनेशी संबंधित तक्रार ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येत नसल्यास शेतकऱ्यांना ऑफलाइन तक्रार दाखल करण्याचीही सुविधा आहे. संबंधित तालुक्याच्या सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार करता येईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जयसिंग ठाकूर यांनी दिली आहे.
त्यामुळे कर्जमाफीच्या लाभासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.